business newsKhadi Village Industries Board 800 crore bees mumbai sakal
मुंबई

मुंबई : खादी ग्रामोद्योग मंडळाने ८०० कोटी मधमाशा दिल्या

मधमाशीपालन हा व्यापक उपक्रम असून लाखो मधमाशीपालनकर्ते त्यांच्या उपजीविकेसाठी मधमाशांवर अवलंबून असतात.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : शेतातील पिकांच्या परागीकरणासाठी अत्यंत महत्वाच्या अशा ८०० कोटी मधमाशांची भर खादी ग्रामोद्योग मंडळाने आतापर्यंत निसर्गात घातली असल्याची माहिती नुकतीच जागतिक मधमाशी दिनानिमित्त देण्यात आली. आयोगाने सन २०१७ मध्ये सुरु केलेल्या मधमाशीपालन कार्यक्रमात देशातील बेरोजगारांना एक लाख सत्तर हजार मधमाशी पेट्या दिल्या. या कार्यक्रमाचे आता चांगले परिणाम दिसून येत असल्याचेही आयोगाचे अध्यक्ष विनयकुमार सक्सेना आपल्या व्हिडियो संदेशात म्हणाले. मुंबई येथील मुख्यालयात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आयोगाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रीता वर्मा होत्या.

मधमाशीपालन हा व्यापक उपक्रम असून लाखो मधमाशीपालनकर्ते त्यांच्या उपजीविकेसाठी मधमाशांवर अवलंबून असतात. जंगलात आणि शेतीमध्ये परागीभवन करण्याबरोबरच, मधमाश्या जैवविविधता राखण्यात, अनेक वनस्पतींचे अस्तित्व आणि पुनरुत्पादन सुनिश्चित करण्यात, वनीकरणास साह्य करण्यात, टिकाऊपणा आणि हवामान बदलाशी जुळवून घेण्यात, कृषी उत्पादनांचे प्रमाण आणि गुणवत्ता सुधारण्यात मोठी भूमिका बजावतात, अशी माहिती यावेळी देण्यात आली. मधमाशा नष्ट झाल्या तर शेतातील पिकांचे परागीकरण बंद होऊन धान्यांची कणसे येणारच नाहीत व मानवजातच नष्ट होऊ शकते, असाही इशारा जाणकारांनी दिल्याचा दाखलाही देण्यात आला.;शेतातील पिकांच्या परागीकरणासाठी अत्यंत महत्वाच्या अशा ८०० कोटी मधमाशांची भर खादी ग्रामोद्योग मंडळाने आतापर्यंत निसर्गात घातली असल्याची माहिती नुकतीच जागतिक मधमाशी दिनानिमित्त देण्यात आली.

आयोगाने सन २०१७ मध्ये सुरु केलेल्या मधमाशीपालन कार्यक्रमात देशातील बेरोजगारांना एक लाख सत्तर हजार मधमाशी पेट्या दिल्या. या कार्यक्रमाचे आता चांगले परिणाम दिसून येत असल्याचेही आयोगाचे अध्यक्ष विनयकुमार सक्सेना आपल्या व्हिडियो संदेशात म्हणाले. मुंबई येथील मुख्यालयात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आयोगाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रीता वर्मा होत्या. मधमाशीपालन हा व्यापक उपक्रम असून लाखो मधमाशीपालनकर्ते त्यांच्या उपजीविकेसाठी मधमाशांवर अवलंबून असतात. जंगलात आणि शेतीमध्ये परागीभवन करण्याबरोबरच, मधमाश्या जैवविविधता राखण्यात, अनेक वनस्पतींचे अस्तित्व आणि पुनरुत्पादन सुनिश्चित करण्यात, वनीकरणास साह्य करण्यात, टिकाऊपणा आणि हवामान बदलाशी जुळवून घेण्यात, कृषी उत्पादनांचे प्रमाण आणि गुणवत्ता सुधारण्यात मोठी भूमिका बजावतात, अशी माहिती यावेळी देण्यात आली. मधमाशा नष्ट झाल्या तर शेतातील पिकांचे परागीकरण बंद होऊन धान्यांची कणसे येणारच नाहीत व मानवजातच नष्ट होऊ शकते, असाही इशारा जाणकारांनी दिल्याचा दाखलाही देण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe : कामातचं नाही सोशल मीडियावरही तुकाराम मुंढेंचा जलवा; देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, विश्वास नांगरे- पाटलांना टाकलं मागे

Nipani Tavandi Ghat Case : राष्ट्रीय महामार्गावरील तवंदी घाटाजवळ दगडाने ठेचून गडहिंग्लज साखर कारखान्यातील कर्मचाऱ्याचा खून; महमदवर धारदार शस्रानेही हल्ला

China Nepal Border: मृत्यूचे तांडव डोळ्यांसमोर पाहतोय! प्रत्यक्षदर्शीचा अनुभव; चीन-नेपाळ सीमेवर अडकले राज्यातील ४०० भाविक

Marathi News Live Updates : २०२७च्या जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र रकान्याची मागणी, राज्यस्तरीय मोर्चासह देशव्यापी आंदोलनाची तयारी

Sarvajan Pension Scheme: वृद्ध, विधवा अन् दिव्यांगांना दर महिन्याला थेट खात्यात पेन्शन; ‘सर्वजन पेन्शन योजने’साठी पात्रता काय?

SCROLL FOR NEXT