मुंबई

Vasai Virar: वसई विरारचा पाणी प्रश्न सुटणार, देहेरजेमधून महानगरपालिकेला मिळणार तब्बल इतके पाणी

Water Problem : सन २०५५ पर्यंतच्या प्रकल्पित लोकसंख्येस आवश्यक असणाऱ्या पाण्याचे नियोजन आमदार हितेंद्र ठाकूर यांनी केले आहे.

सकाळ वृत्तसेवा

संदीप पंडित

वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या सन २०५५ च्या प्रकल्पित लोकसंख्येस पुरेसे पाणी उपलब्ध होण्याकरीता "देहेरजे मध्यम प्रकल्पातून पाणी आरक्षित करण्याबाबतच्या आमदार हितेंद्र ठाकूर यांनी केलेल्या मागणी नुसार उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झाली.

या बैठकीत वसई-विरार शहर महानगरपालिकेस २०३१ पर्यंत १९० द.ल.ली. प्रतिदिन पाणी देहेरजी मध्यम प्रकल्पातून उपलब्ध करून देण्याच्या मागणीवर शिक्का मोर्तब करण्यात आले त्यामुळे भविष्यातील वाढत्या लोकसंख्येस पिण्याचे पाणी उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

या बैठकीत आमदार हितेंद्र ठाकूर यांनी देहरजी प्रकल्पासाठी बसई विरार महानररपालिकेने रु.१६५ कोटी रक्कम जलसंपदा विभागाला सन २०१४-१५ मध्ये वर्ग केली असल्याचे तसेच धरणातून वसई विरार महानगरपालिकेस जलसंपदा विभागाने दि.०४/०३/२०१४ च्या शासन निर्णयानुसार पिण्याचे पाणी आरक्षित केले आहे.

सदर पाणी यापुढेही तसेच ठेवण्याची व वसई विरार महानगरपालिकेच्या वाट्याचे पाणी इतर कुठेही न देणेबाबत मागणी उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री, यांच्याकडे केली, तसेच देहेरजी धरणावरून सन २०३१ पर्यंत महापालिकेस पाणी उपलब्ध होण्याकरीता पाणी पुरवठा योजना तयार करून पाणी उपलब्ध करून द्यावे अशी देखील मागणी आमदार हितेंद्र ठाकूर यांनी केली

. हितेंद्र ठाकूर यांच्या मागणीनुसार उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री, देवेंद्र फडणवीस यांनी जलसंपदा विभागाने यापूर्वी शासन निर्णय दि. ०४/०३/२०१४ प्रमाणे तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश जलसंपदा विभागास व मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणास दिले आहेत. तसेच देहेरजी धरणावरून पाणी पुरवठा योजना तयार करून महापालिकेस सन २०३१ पर्यंत पाणी उपलब्ध करून देण्याच्या सूचना MMRDA ला देण्यात आल्या आहेत.

उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री,देवेंद्र फडणवीस अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण, आमदार हितेंद्र ठाकूर (वसई), आमदार क्षितीज ठाकूर (नालासोपारा), आमदार राजेश पाटील (बोईसर), आमदार निरंजन डावखरे (कोंकण पदविधर मतदार संघ) आदी मान्यवर तसेच जलसंपदा विभाग व उर्जा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव, कार्यकारी संचालक (KIDCL), महापालिका आयुक्त, मुख्य अभियंता (जलसंपदा), कार्यकारी अभियंता (MMRDA) इत्यादी अधिकारी उपस्थित होते.

याव्यतिरिक्त बहुजन विकास आघाडीचे जेष्ठ नेते नारायण मानकर, .प्रफुल्ल साने हे देखील उपस्थित होते.वरील निर्णयामुळे वसई-विरार शहर महानगरपालिकेस सन २०३१ पर्यंत १९० द.ल.ली. प्रतिदिन पाणी देहेरजी मध्यम प्रकल्पातून उपलब्ध होणार असून भविष्यातील वाढत्या लोकसंख्येस पिण्याचे पाणी उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या व्यतिरिक्त खोलसापाडा १ व खोलसापाडा-२ तसेच सुसरी या प्रकल्पातून भविष्यात उपलब्ध होणाऱ्या पाण्यामुळे सन २०५५ पर्यंतच्या प्रकल्पित लोकसंख्येस आवश्यक असणाऱ्या पाण्याचे नियोजन आमदार हितेंद्र ठाकूर यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT