Mumbai sakal
मुंबई

Central Railway : मुंबई-पुणे, मुंबई-चेन्नई गाड्या पूर्ववत

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - चेन्नई एग्मोर अतिजलद त्रि-साप्ताहिक सेवा एक डिसेंबरपासून सुरू

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मध्य रेल्वेने मुंबई-पुणे आणि मुंबई-चेन्नई दरम्यानच्या रेल्वे सेवा पूर्ववत करण्याचा निर्णय मध्य रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - पुणे इंटरसिटी दैनंदिन सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - चेन्नई एग्मोर अतिजलद त्रि-साप्ताहिक सेवा एक डिसेंबरपासून सुरू करण्यात येणार आहे.

गाडी क्रमांक 12127 इंटरसिटी एक्सप्रेस एक डिसेंबरपासून सीएसएमटीहून दररोज सकाळी 6.40 वाजता पुण्यासाठी सुटेल. ही गाडी पुणे येथे त्याच दिवशी सकाळी 9.57 वाजता पोहचेल. गाडी क्रमांक 12128 इंटरसिटी एक्सप्रेस एक डिसेंबरपासून पुणे येथून दररोज सायंकाळी 5.55 वाजता सुटेल. त्याच दिवशी रात्री 9.05 वाजता सीएसएमटी येथे पोहचेल. या गाडीला दादर, ठाणे, लोणावळा आणि शिवाजी नगर (फक्त 12127 साठी) थांबा देण्यात येणार आहे. या गाडीला दोन वातानुकूलित चेअर कार आणि 12 द्वितीय आसन श्रेणी असणार आहे.

गाडी क्रमांक 22157 अतिजलद एक डिसेंबरपासून सीएसएमटी येथून दर सोमवारी, बुधवारी आणि शुक्रवारी रात्री 11.55 वाजता सुटेल. चेन्नई एग्मोर येथे दुसऱ्या दिवशी रात्री 11.15 वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक 22158 अतिजलद 4 डिसेंबरपासून चेन्नई एग्मोर येथून दर गुरुवारी, शनिवारी आणि सोमवारी सकाळी 6.20 वाजता सुटेल आणि सीएसएमटी येथे दुसऱ्या दिवशी पहाटे 5.50 वाजता पोहचेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Narendra Modi: घुसखोरांना बाहेर पाठवणार; मोदी, काँग्रेसने बिहारींचा अपमान केला, विरोधकांना विकास असह्य

ST Bus Ticket Price Hike: एल्फिन्स्टन पूल कामाचा प्रवाशांना भुर्दंड, एसटी तिकीट दरात २० रुपयांची वाढ!

दूध, तूप अन् लोणी होणार स्वस्त! मदर डेअरीचा मोठा निर्णय, GST कपातीनंतर दरात केले बदल

High Court: राज्यात राष्ट्रीय शिक्षण धोरणाची अंमलबजावणी होत आहे का? उच्च न्यायालय, राज्य शासनाला तीन आठवड्यात मागविले उत्तर

'IND vs PAK सामना १५ ओव्हरनंतर बंदच केला, कारण...', सौरव गांगुलीचं मोठं व्यक्तव्य

SCROLL FOR NEXT