eknath shinde  sakal
मुंबई

Mumbai News : त्यांची अवस्था रावणासारखी होईल ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका

आपल्या अहंकारापायी ज्यांनी बाळासाहेबांचे विचार विकले, त्यांच्या विचारांना तिलांजली दिली, ज्या काँग्रेसला वंदनीय बाळासाहेबांनी कधीच जवळ केले नाही, त्या काँग्रेसला सत्तेच्या मोहापायी आणि खुर्चीसाठी उद्धव ठाकरे यांनी कडेवर घेतले.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : ‘‘आपल्या अहंकारापायी ज्यांनी बाळासाहेबांचे विचार विकले, त्यांच्या विचारांना तिलांजली दिली, ज्या काँग्रेसला वंदनीय बाळासाहेबांनी कधीच जवळ केले नाही, त्या काँग्रेसला सत्तेच्या मोहापायी आणि खुर्चीसाठी उद्धव ठाकरे यांनी कडेवर घेतले. निवडणूक एकाबरोबर जिंकल्या आणि सरकार दुसऱ्यासोबत स्थापन केले. यांच्या अहंकारामुळे राज्य मागे गेले. जी अवस्था अहंकारी रावणाची झाली, तीच अवस्था यांची होईल,’’ अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी येथे केली. सत्तेच्या लालसेपोटी ज्या लोकांनी बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली त्यांना प्रभू श्रीराम सुबुद्धी देवो, असा टोलाही त्यांनी लगावला.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी बाळासाहेब भवन येथे बाळासाहेबांच्या प्रतिमेला अभिवादन केले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना शिंदे म्हणाले, ‘‘राज्याच्या हितासाठी आणि जनतेच्या कल्याणासाठी आम्ही आधीचे सरकार उलथवून लावून जनतेचे सरकार स्थापन केले. आज ते आम्हाला रावण म्हणतात. राम कोण आणि रावण कोण हे जनतेला ठाऊक आहे. ज्यांनी राममंदिराला विरोध केला, प्रभू रामाच्या अस्तित्वावर प्रश्न उपस्थित केला त्यांना रामाबद्दल बोलण्याचा अधिकार नाही,’’ असे शिंदे यांनी सुनावले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Subhanshu Shukla meet PM Modi : शुभांशू शुक्ला यांनी पंतप्रधान मोदींना दिली ‘ती’ खास भेटवस्तू ; जाणून घ्या, मोदी काय म्हणाले?

Nanded Rain : मुखेडमध्ये ३०० जणांना वाचविले; नांदेडमध्ये पावसाचा धुमाकूळ, ९ जण बेपत्ता, म्हशींसह ७० जनावरे गेली वाहून

Eleventh Admission : अकरावीच्या ‘सर्वांसाठी खुल्या’ फेरीअंतर्गत प्रवेशासाठी २२ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

Pune News : नेत्यांची वेळ न मिळाल्याने पुण्यातील उड्डाणपुलांचे उद्‍घाटन रखडले

इतिहासाची अमूल्य खुण भारतात! इतिहासाशी पुन्हा जोडणारा क्षण, मुख्यमंत्री फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT