मुंबई

'मुख्यमंत्र्यांचा राज्याच्या प्रशासनावर वचक नाही'; मनसेच्या घणाघाती टीका

तुषार सोनवणे

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा राज्याच्या प्रशासनावर पुरेसा वचक नाही, मुख्यमंत्री फक्त प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात व्यग्र आहेत. अधिकाऱ्यांच्या बदल्या करतांनाही आपल्या फेवर मधल्या अधिकाऱ्यांना हव्या तशा विभागात बदल्या मिळत आहेत अशी टीका मनसेचे संदीप देशपांडे यांनी केली आहे.

कोरोना काळात प्रशासनाने नागरिकांच्या पाठिशी भक्कमपणे उभे राहणं अपेक्षित असताना महाविकासआघाडी सरकाने नागरिकांना ओरबाडण्याचं काम केलं असल्याचे अनेक उदाहरणे आहेत. पुण्यातील एका पत्रकाराचा रुग्णवाहिका न मिळाल्याने मृत्यू झाला आहे. सरकाने फक्त कोरोनाच्या नावावर पैसे ओरबाडण्याचं काम केलं आहे, असा आरोप मनसेच्या संदीप देशपांडे य़ांनी केला आहे. पत्रकाराचा साध्या रुग्णावाहिकेअभावी मृत्यू होत असेल तर पुण्यातील जंबो कोरोना सेंटरचा उपयोग काय? कोव्हिड सेंटरच्या नावाला फक्त तंबू उभारले आहेत का असा संतप्त सवालही संदीप यांनी यावेळी केला.

मुख्यमंत्री राज्यात वास्तविक परिस्थितीचा अंदाज घरातून घेत आहे. त्यांना ते घरात बसून कसे कळणार? नागरिकांमध्ये गेल्याशिवाय प्रश्न समजू शकणार नाही. राज्यातील लाखो लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. मुख्यमंत्री सर्व सामान्यांना कधी दिलासा देणार असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.

दरम्यान भाजपनेही मुख्यमंत्र्यांच्या घरात बसून राज्याचा गाडा हाकण्यावर टीका केली आहे.राज्यात कोरोनाचा कहर सुरू आहे. कोकणात निसर्ग वादळाने थैमान घातले; पण मुख्यमंत्र्यांना तिथे जायला वेळ नाही. काल-परवा चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा जिल्हा पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे; परंतु मुख्यमंत्री उद्धव ठाकरे "मातोश्री'च्या बाहेर यायला तयार नाहीत. क्वचित अपवाद म्हणून एखाद्या ठिकाणी गेले असतील; पण सरकारचा प्रमुख म्हणून काम करत असताना अशाप्रकारे घरात बसून राज्य चालवता येत नाही. यामुळे आता जनतेत मोठ्या प्रमाणात असंतोष आहे, अशी टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune School: स्कॉरलशीपची परीक्षा पास पण शाळा निकालच देईनात; महापालिकेचा भोंगळ कारभार

MI Playoff Scenario : 8 सामने हरल्यानंतरही मुंबई इंडियन्स प्लेऑफमध्ये जाऊ शकते का? समजून घ्या समीकरण

Sharad Pawar on Narendra Modi: नरेंद्र मोदींनी कुठं कुटुंब सांभाळलं... शरद पवारांचा पलटवार! नेमकं काय म्हणाले?

Raj Thackeray: शोले, गांधी अन् शक्ती.. राज ठाकरेंना कसं लागलं चित्रपटांचं वेड? बिग बींच्या 'त्या' सीनबद्दल म्हणाले...

शक्तिपीठ महामार्ग : पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या मनात खदखद का आहे?

SCROLL FOR NEXT