Uddhav thackeray Twitter
मुंबई

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज जनतेला करणार संबोधित

काय बोलणार मुख्यमंत्री ?

दीनानाथ परब

मुंबई: महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यातील जनतेला संबोधित करणार आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून उद्धव ठाकरे राज्यातील जनतेशी संवाद साधतील. कालच लॉकडाउन वाढण्याची घोषणा करण्याता आली आहे. त्यामुळे भविष्यातील राज्याची दिशा कशी असेल?, लसीकरण आणि अर्थव्यवस्थेला चालना कशी देणार? त्या दृष्टीने मुख्यमंत्री बोलतील अशी अपेक्षा आहे.

कोरोनाचा कहर सुरु असल्यामुळे राज्यात सध्या लॉकडाउन सुरु आहे. आज लॉकडाउनचा पहिला टप्पा संपत असताना आणखी १५ दिवसांसाठी लॉकडाउन जाहीर करण्यात आलाय. लॉकडाउनमुळे मोठ्या प्रमाणात रुग्ण संख्या कमी झालेली नसली, तरी मुंबई, पुणे, औरंगाबाद अशा मोठ्या शहरात रुग्णसंख्या स्थिरावल्याचे दिसते. त्यामुळे लॉकडाउनचे परिणाम आणखी दोन आठवड्यात दिसू शकतात.

या काळात उद्योग-व्यवसाय बंद असल्यामुळे राज्याचे मोठे नुकसान होतेय. राज्य सरकारने काही घटकांसाठी मदत जाहीर केली आहे. पण ती अत्यल्प आहे. त्यामुळे पुढच्या काही दिवसात कोरोनाचा फैलाव रोखताना अर्थव्यवस्थेचं चाक सुद्धा रुतणार नाही याची काळजी घ्यावी लागणार आहे. त्या दृष्टीने उद्धव ठाकरे काय बोलतात? याकडे सगळ्यांचे लक्ष असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

करदात्यांसाठी गूडन्यूज! ITR दाखल करण्यासाठी १ दिवस मुदतवाढ, मध्यरात्री निर्णय; आजच भरा

Solapur Rain : कोरड्याठक सीना नदीला २५ वर्षांत पहिल्यांदाच भयंकर पूर, १० गावे पाण्याखाली, हजारो नागरिकांचा संपर्क तुटला

Maharashtra Weather Updates : राज्यात परतीच्या पावसाचा धुमाकूळ, आजही मुंबई-पुणे, मराठवाड्याला धोक्याचा इशारा

Pune Heavy Rain: सहा तालुक्यांत अतिवृष्टी; १७ धरणांतून पाणी सोडले, दौंडमध्ये ढगफुटी

Ujani Dam:'भीमा नदीला तीन महिन्यांत तिसऱ्यांदा पूर'; उजनीतून पाच वर्षांनंतर यंदा सोडले १५२ टीएमसी पाणी, ९० हजार क्युसेकचा विसर्ग

SCROLL FOR NEXT