मुंबई

ठाण्यात मनसैनिक आणि पोलिसात जोरदार राडा; आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

तुषार सोनवणे

मुंबई - राज्यातील नागरिकांना आलेल्या वाढीव वीजबिलांविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आंदोलन पुकारले आहे. ठाण्यातही जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या नेतृत्वात आंदोलनाची हाक देण्यात आली होती. परंतु मोर्चा सुरू होताच पोलिस आणि मनसैनिकांमध्ये झटापटी झाली. 

राज्यातील नागरिक कोरोना काळात आर्थिक तंगीत असताना वाढीव वीजबिलांमुळे त्यांच्यावरील ताण वाढला आहे. राज्य सरकारने आधी या बिलांमध्ये सवलत देण्यात येईल असे म्हटले होते. परंतु त्यानंतर महावितरणाने सवलत नाकारल्या नंतर नागरीकांमध्ये संतापाची लाट आहे. याबाबत मनसेने जोरदार आंदोलन पुकारले आहे, मुंबई, ठाणे, पुणे सह राज्यात अनेक ठिकाणी आंदोलने सुरू आहेत. ठाण्यात कॅडबरी जंक्शन - नौपाडापासून अविनाश जाधव यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले.  पोलिसांनी या आंदोलनाला परवानगी दिली नव्हती. म्हणून मनसैनिक आणि पोलिसांमध्ये झटापटी झाल्याची माहिती मिळत आहे. यावेळी आंदोलनकर्ते आणि पोलिसात जोरदार राडा पाहायला मिळाला.

आंदोलनकर्त्यांवर पोलिसांनी कारवाई केली. अविनाश जाधव, रविंद्र जाधव आणि अभिजित पानसे यांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. यासोबत मनसेच्या महिला कार्यकर्त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. 'सरकार आमचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करीत आहे. सर्वसामान्यांना वीजबिलांतून सवलत मिळायलाच हवी. सरकारचा आम्ही निषेध करतो', असे अविनाश जाधव यांनी म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US-Iran MoU Signed: मोठी बातमी! अमेरिका-इराण यांच्यातील सामंजस्य करारावर दोन्ही देशांच्या स्वाक्षऱ्या; 'या' दिवशी पूर्ण क्षमतेने सुरु होणार 'होर्मुज'

Vidhan Parishad Election : गंगापूरमध्ये महायुती विरुद्ध मविआ लढत; ३३ पैकी ३१ मते महायुतीकडे, तरीही निकालाकडे तालुक्याचे लक्ष

IND vs AFG, ODI: 'रोहित शर्माची काहीच चूक नव्हती...' शुभमन गिलसोबतच्या रनआऊट वादावर आर अश्विन स्पष्टच बोलला

Karad Airport Issue : कऱ्हाड विमानतळ घेईना ‘टेक-ऑफ’! विस्तारीकरणासाठी २२१ कोटी मंजूर होऊनही कार्यवाही संथच

Janhavi Virkar : बारामतीच्या लेकीची भारताच्या जर्सीपर्यंत झेप; सावळच्या जान्हवीची भारतीय महिला अंडर-१९ क्रिकेट संघात निवड

SCROLL FOR NEXT