मुंबई

मुख्यमंत्र्यांच्या अलिबाग दौऱ्यानंतर वर्षावर मुख्यमंत्री आणि शरद पवारांमध्ये तातडीची बैठक...

सकाळवृत्तसेवा

मुंबई - महाराष्ट्रात आलेल्या निसर्ग चक्रीवादळाचा कोकण आणि रायगडला मोठा फटका बसलाय. अशात कालच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक बोलावली होती. आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील रायगडमधील अलिबागला जाऊन वादळानंतरचा आढावा घेतला. तिथल्या नागरिकांशी संवाद साधला. 

त्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यात मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानावर बैठक सुरु आहे. निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आणि शरद पवारांमध्ये बैठक सुरु असल्याची माहिती मिळतेय.

काल शरद पवार, अजित पवार, सुनील तटकरे, जयंत पाटील यांच्यात बैठक पार पडली होती. कोकण आणि रायगडला आता मोठ्या आर्थिक पॅकेजची गरज भासणार आहे. अशात याचसंदर्भात मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा होणं अपेक्षित होतं.

अशात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आता आपला अलिबाग दौरा संपवून आल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर दोन्ही नेत्यांमध्ये बैठक होतेय. आदित्य ठाकरे देखील मुख्यमंत्र्यांसोबत अलिबागला गेले होते. त्यामुळे आदित्य ठाकरे देखील या बैठकीला उपस्थित असण्याची  शक्यता वर्तवण्यात येतेय. 

बातमी अपडेट होत आहे.... 

CM uddhav thackeray and sharad pawars meeting at varsha bungalow

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ऐनवेळी पायलट का बदलले? मुंबईत CCTVमध्ये काय दिसलं? अजितदादांच्या अपघात प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी सगळंच सांगितंल

Madha News : माढ्याचा आठवडा बाजार आता हायटेक आणि शिस्तबद्ध! कार्यकर्त्यांच्या 'फिल्डिंग'मुळे वाहतूक कोंडीला ब्रेक, महिला व वृद्धांकडून कौतुक

राज्य सरकारची मोठी घोषणा! २६ आणि २७ मार्चला रामनवमीनिमित्त सार्वजनिक सुट्टी जाहीर; पण कुणाला? जाणून घ्या...

Madha News : माढ्याचा पाण्याचा प्रश्न सुटणार! ५२ कोटींच्या पाणीपुरवठा योजनेसाठी नगराध्यक्षा मीनल साठे यांचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांना साकडे

कर्नाटकला अधिकारच नाही, ही तर महाराष्ट्राची मानहानी; अजित पवार अपघात प्रकरणी FIR वर मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं

SCROLL FOR NEXT