Chief Minister Uddhav Thackeray
Chief Minister Uddhav Thackeray 
मुंबई

मुंबईतील गर्दी कायम राहिल्यास निर्बंध वाढवावे लागतील- मुख्यमंत्री

कार्तिक पुजारी

मुंबई- मेट्रो चाचणी, बायपास भूमिपूजनानंतर वेगवेगळ्या विकासकामांचं उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. मुख्यमंत्र्यांनी मेट्रो चाचणीला हिरवा कंदील दाखवला. यावेळी टर्मिनल १ आणि २ वरील प्रवेश मार्ग प्रकल्पाचेही भूमीपूजन झाले. त्यामुळे मुंबईकरांचा प्रवास सुपरफास्ट होण्याची शक्यता आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय मंत्री रामदास आठवले आदि नेत्यांनी उपस्थिती लावलीये. दुर्गाडी मल्टिपीसिटीज पुस्तकाचं प्रकासन मुख्यमंत्र्याच्या हस्ते करण्यात आले. एमएमआरडीएच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री काय बोलणार याकडे लक्ष लागलं होतं.

पुण्यश्लोक अहिल्यादेवींना मुख्यमंत्र्यांनी यावेळी अभिवादन केलं. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यात निर्बंध होते, याकाळातही मेट्रो निर्माणाचे काम सुरु होते. मी कार्यक्रमाला येताना रस्त्यावर गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं. लोकांनी गाफील होऊ नये, कारण कोरोना अजून संपलेला नाही. लोक असेच फिरत राहिले तर मुंबईमध्ये सुद्धा निर्बंध अधिक कठोर करावे लागतील. जेव्हा निर्बंध उठतील तेव्हा आयुष्य गतीमान होण्यासाठी विकासकाम सुरु आहेत.

कोरोनाच्या संकटातही विकासकामं सुरु ठेवण्यासाठी प्रयत्न केल्याबद्दल अधिकाऱ्यांचे धन्यवाद. मुंबई हे आधुनिकेतीची कास धरणारं शहर आहे, पण शहराला प्राचिन वारसा सुद्धा आहे. जंगले आहेत, पण त्यात वन्यजीव सुद्धा आहेत. मिठाग्रह आहे, समुद्र आहे, वनस्पती आहेत, अशा विविधतेने नटलेल्या शहराचं नेतृत्व मी करत आहेत. जे काही चांगलं काम होत आहे, त्यात माझं एकट्याचं कर्तुत्व नाही, हे कर्तुत्व माझ्या सहकाऱ्यांचे आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांचे आहे. श्रेय कधीही एकट्याचं असू शकत नाही. कॅप्टन एकटा काहीही करु शकत नाही. हे एक सांघिक यश असते, असं मुख्यमंत्री म्हणाले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी रामदास आठवले यांच्याबाबत बोलताना मिश्चिल टिप्पणी केली. आठवले साहेबांनी सांगितलं की, जे काही कमी पडत आहे ते राज्यात आणताहेत. आता गेल्यानंतर आणखी काही आठवलं तर मी त्यांना सांगतो. तसं ते माझ्या शेजारीच राहताता, असं ते म्हणाले. अशी सहकारी माणसं ही सोबत आल्यानंतर विकास हा नक्की होणार, असंही मुख्यमंत्री म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: तेव्हा अजित पवार नवखे होते, २००४ साली मुख्यमंत्री पदाची संधी का घालवली? शरद पवारांनी सांगितला माइंड गेम

Weight Gain Foods : ‘या’ खाद्यपदार्थांचे सेवन केल्याने झपाट्याने वाढू शकते वजन, खाण्यापूर्वी जरूर करा विचार

गोफण | 'बिनशर्त'ची सुपारी दणक्यात वाजली!

MS Dhoni : MS धोनीमुळे हरली CSK? 'या' मोठ्या चुकीमुळे प्लेऑफचे तिकीट गेलं हातातून

Nancy Tyagi: 30 दिवस, 1000 मीटर कापड अन् 20 किलो वजन; कान चित्रपट महोत्सवात परिधान केला स्वत: शिवलेला ड्रेस, नॅन्सी त्यागी आहे तरी कोण?

SCROLL FOR NEXT