मुंबई

हजारो पशू पक्षी होरपळले

सकाळ वृत्तसेवा

अलिबाग : रायगड जिल्ह्यात दरवर्षी सुमारे 200 वणवे लागतात. यामध्ये सरासरी एक हजार हेक्‍टरचे नुकसान होते. त्यामुळे वायुप्रदूषणासह जंगलातील साधनसंपत्ती आणि पशू-पक्ष्यांची मोठी हानी होते, असे आकडेवारीवरून दिसत आहे. त्यामुळे पर्यावरणप्रेमी चिंता व्यक्त करीत अहोत. तसेच अशा घटना रोखण्यात वन विभाग अपयशी ठरत असल्याचा आरोपही होत आहे. 

जिल्ह्यात सुमारे दीड लाख हेक्‍टर क्षेत्र जंगलाचे आहे. त्यामध्ये गवताळ कुरणे, दगडफूल, सोनकी प्रकार, कारवी, पानफुटी, कलारगा, श्वेतांबरी, रानआले, सोनजाई, गजकर्णिका, रानकेळी, सापकांदा, सर्पगंधा, अश्वगंधा यांसारख्या बहुमूल्य वनस्पतींचा समावेश आहे. घुबड, चंडोल, रॉबिन रानकोंबड्या, मोर आदी पक्ष्यांसह अनेक प्रकारचे साप आणि प्राणी आढळतात. तब्बल 184 प्रकारच्या फुलपाखरांच्या प्रजातीही आहेत. त्याला वणव्यांच्या घटनांमुळे धोका पोहोचतो.

वन विभागाच्या म्हणण्यानुसार जंगलाचे वणव्यांपासून संरक्षण करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या उपाययोजना केल्या जातात. अधिकारी, कर्मचारी जंगलावर लक्ष ठेवतात. वणवे आटोक्‍यात आणण्यासाठी रोधक पट्टे तयार करण्यात येतात. दरम्यान, तीन वर्षांत 2 हजार 916.338 हेक्‍टर क्षेत्राचे वणव्यांमुळे नुकसान झाले आहे. 2019 मध्ये वणवे लागण्याचे क्षेत्र कमी असले तरीही जंगलातील साधनसंपत्तीबरोबरच पशू-पक्ष्यांचे अस्तित्व धोक्‍यात येत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. 

ही आहेत कारणे ः 
रानडुक्कर व अन्य वन्यप्राण्यांच्या शिकारीसाठीही वणवे लावले जातात. तो पेटला की वन्य प्राणी आगीच्या विरुद्ध दिशेने पळायला सुरुवात करतात. त्यामुळे त्यांची शिकार करणे सहज शक्‍य होते. काही ठिकाणी पिकांच्या लागवडीसाठी वणवे लावण्यात येतात. वृक्षतोडीसाठीही वणवे लागतात. 
 
वणवे लागण्याचे अधिक प्रमाण असलेल्या ठिकाणी "फायर वॉचर' ठेवण्यात आले आहे. "फायर ब्लोअर' हे यंत्रही आहे. वणवे लागू नयेत यासाठी संयुक्त वन समितीच्या पदाधिकारी, सदस्य व ग्रामस्थांच्या मदतीने लक्ष ठेवण्यात येत आहे. 
- विकास तरसे, वन परिक्षेत्रीय अधिकारी, अलिबाग 
............... 
वणवे रोखण्यासाठी व्यापक जनजागृती आवश्‍यक आहे. वनांचे महत्त्व व वणव्यांचे मानवी जीवनावर होणारे घातक परिणाम याबाबात जनजागृती केली पाहिजे. अपुरी यंत्रणा वाढविण्यासाठी सरकारने वनाधिकारी आणि वनकर्मचाऱ्यांची भरती करावी. 
- विनोद पाटील, सामाजिक कार्यकर्ता 
................................ 
वर्ष - वणव्यांची संख्या - वणव्यांची झळ पोहोचलेले क्षेत्र (हेक्‍टरमध्ये) 

2017 - 186 - 1035.490 

2018 - 205 - 1089.588 

2019 - 190 - 791.260 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd Test: बुमराहशी जो नडला, त्याला आम्ही गाडला! शुभमन गिल अन् झॅक क्रॉली यांच्यात बाचाबाची, काय घडलं? Video

IND vs ENG 3rd Test: भारताकडे '०' धावांची आघाडी; ११ धावांत गमावले ४ बळी, कसोटीत असे केव्हा घडले अन् निकाल काय लागला होता?

Sanjay Gaikwad Imtiaz Jaleel Clash: ‘’तुला तर असं मारेन..असं मारेन की, परत तू...’’ ; संजय गायकवाडांनी आता इम्तियाज जलील यांना भरला दम!

'मला भारताकडून पुन्हा कसोटी क्रिकेट खेळायचे आहे'; अजिंक्य रहाणेची मन की बात! इंग्लंडमधून निवड समितीला पाठवला मॅसेज

IND vs ENG 3rd Test: भारताने ५० वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला! रवींद्र जडेजा थेट गॅरी सोबर्स यांच्या पंक्तीत बसला, जगात दोघंच खेळाडू असे करू शकलेत

SCROLL FOR NEXT