मुंबई

बहुचर्चित 33 कोटी वृक्ष लागवडीत गोलमाल!

सकाळ वृत्तसेवा

टिटवाळा : भाजप-शिवसेना महायुती सरकारच्या काळात बहुचर्चित 33 कोटी वृक्ष लागवड योजनेचा शुभारंभ 1 जुलै 2018 ला कल्याण तालुक्‍यातील वरप येथील राधास्वामी आश्रमच्या मागील बाजूस असलेल्या वनक्षेत्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री एकनाथ शिदे यांच्या उपस्थितीत मोठ्या दिमाखात करण्यात आला.

यावेळी वरप वनक्षेत्रात 10 हजार रोपे लावण्यात आली होती. या रोपांच्या संवर्धनासाठी पुढील पाच वर्ष लाखो रुपयांची तरतूद करण्यात आली. मात्र लागवडीपासून आतापर्यंत सर्व खर्च फक्त कागदावरच झाल्याचे प्रत्यक्षात जागेवरील रोपवनाच्या दयनीय अवस्थेवरून लक्षात येत आहे. या रोपांच्या संवर्धनाकडे संबंधितांनी दुर्लक्ष केल्याने सध्या येथे पाच हजार वृक्षही शिल्लक नसल्याचे वास्तव आहे. 

सरकारतर्फे रोपवटिकेवर लाखो रुपयांचा खर्च करण्यात येतो. असे असतानाही सरकारी रोपवाटिकेत रोपे शिल्लक असताना कल्याण वनक्षेत्रपाल यांनी खासगी रोपवाटिकेतून चढ्या दराने रोपे खरेदी करून याठिकाणी लागवड केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. लागवड केलेल्या दहा हजार वृक्षांपैकी सात हजाराहून अधिक वृक्ष विद्यार्थी व स्वयंसेवी संस्थांनी, ग्रामस्थांनी लोकसेवा म्हणून लागवड केली.

मात्र, या रोपांच्या लागवडीचे बिलही वनक्षेत्रपाल यांनी काढून सरकारी निधीचा अपहार केल्याचा आरोप वरप ग्रामस्थांनी केला आहे. रोपवनातील रोपांना पावसाळ्यानंतर पाणी देण्याची तरतूद असताना फक्त काही दिवस टॅंकरने पाणी दिले गेले. यामध्येही खोटी बिले लावली गेल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. जल संधारणार्थ बांधण्यात आलेले गॅबिअन बंधारे व पाणी मारण्यासाठी खोदण्यात आलेल्या कूपनलिका चुकीच्या ठिकाणी बांधण्यात आल्यामुळे सरकारचे लाखो रुपये वाया गेल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला आहे.

याबाबत वनक्षेत्रपाल कल्याण यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही. स्थानिक वनपाल मच्छिंद्र जाधव यांच्याशी संपर्क साधला असता सर्व खर्च हा वरिष्ठ स्तरावरून झालेला आहे, आपणास काही माहिती नाही, असे त्यांनी सांगितले. 

सदर वृक्षलागवड संगोपनाबाबत वनविभाग यांनी ग्रामस्थांना अंधारात ठेवले आहे. या लागवडीवरील खर्च ग्रामपंचायत वरप अंतर्गत संयुक्त वनव्यवस्थापन समितीमधून होणे गरजेचे असताना ती स्थापन न करता वनक्षेत्रपाल कल्याण यांनी त्यांच्या सोयीसाठी हा सर्व खर्च आपल्या मर्जीतील वनव्यवस्थापन समितीमार्फत परस्पर केला आहे. यामध्ये कामे न करता खोटी बिले काढल्याने सरकारच्या लाखो रुपये निधीचा अपहार झाल्याने त्याबाबत चौकशी करून दोषींवर कारवाई करावी. 
- भाऊ गोधळी, माजी सरपंच वरप 
व पंचायत समिती सदस्य, कल्याण 

यापूर्वी मौजे आपटी येथील वनक्षेत्रात लावण्यात आलेल्या रोपवनात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबत चौकशी सुरू आहे. वरप येथील रोप लागवडीबाबत माहिती घेऊन संबंधित तालुका वन अधिकाऱ्यांवर कारवाई करू. 
- नरेश झुरमुरे 
मुख्य वन संरक्षण अधिकारी, ठाणे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT