मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन देताना खासदार श्रीकांत शिंदे. 
मुंबई

कल्याण लोकसभेत गुन्हेगारी वाढली!

सकाळ वृत्तसेवा

कल्याण : कल्याण लोकसभा मतदार संघातील कळवा, डोंबिवली, उल्हासनगर परिसरात गुन्हेगारीचा आलेख वाढला आहे. खून, चोरी, दरोडे, विनयभंग, महिला अत्याचार आदी गुन्ह्यांची वाढती आकडेवारी पाहता येथील कायदा व सुव्यवस्था बिघडत आहे. याच पार्श्‍वभूमीवर वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्याची मागणी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. 

कल्याण लोकसभा मतदार संघात अनधिकृत बारची संख्या प्रचंड असून तेथे मुलींच्या शरीर विक्रीसाठी छुप्या खोल्याही तयार केल्या जातात. डोंबिवली शहरातील शेलार चौक येथे तीन दिवसांपूर्वी क्षुल्लक वादावरून एका दुचाकीस्वाराची धारदार शस्त्रांनी हत्या करण्यात आली. येथून हाकेच्या अंतरावर टिळकनगर पोलिस चौकी आहे व शेजारीच छोटी पोलिस चौकी असूनही सदर चौकीत एकही पोलिस कर्मचारी त्या वेळी उपस्थित नसल्याचे खासदार शिंदे यांनी मुख्यमंत्री व गृहमंत्री यांच्या निदर्शनास आणून देत सदर गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. 

गेल्या महिन्यात कळवा शहरात लूटमारीसाठी आलेल्या चोरट्यांनी मेडिकलमध्ये काम करत असलेल्या एका युवकावर गोळ्या झाडून त्याची हत्या केली होती. अशाप्रकारे गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून पोलिसांचा वचकदेखील राहिलेला नसल्याचे खासदार शिंदे यांनी म्हटले आहे. याच पार्श्‍वभूमीवर खासदार शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेत निवेदन दिले. गुन्हेगारांवर त्वरित कठोर कार्यवाही करावी आणि सर्व रहदारीच्या भागांमध्ये पोलिसांची गस्त वाढवण्यात यावी, अशी मागणी या वेळी करण्यात आली आहे. 

उल्हास, वालधुनी नदीसाठी स्वतंत्र प्राधिकरण स्थापन करा! 
डोंबिवलीमधील वाढते प्रदूषण कमी करा आणि मुंबईतील मिठा नदीच्या धरतीवर उल्हास व वालधुनी नदीच्या स्वच्छतेसाठी स्वतंत्र समिती प्राधिकरण स्थापन करण्यात यावे, अशी मागणी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पर्यटन व पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे केली आहे. प्रदूषण विषयावर खासदार शिंदे यांनी बुधवारी (ता. 22) आदित्य ठाकरे यांची भेट घेऊन समस्या मांडली.

वालधुनी नदीच्या प्रदूषणामुळे येथील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याचप्रमाणे या परिसरातून वाहणारी उल्हास नदीही प्रदूषणाने वेढली आहे. उल्हास व वालधुनी नदीच्या पाण्याचा वापर पिण्यासाठी; तसेच पिकांसाठीही केला जातो. या दोन्ही नद्यांसाठी प्राधिकरण करून स्वतंत्र समिती स्थापन करण्यात यावी, अशी मागणी शिंदे यांनी केली आहे. त्यावर सदर ठिकाणी प्रत्यक्ष येऊन पाहणी करणार असल्याची ग्वाही आदित्य ठाकरे यांनी दिली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tilak Varma Injury: तिलक न्यूझीलंडविरुद्ध T20 सामन्यांतून बाहेर, वर्ल्ड कपमध्ये खेळणार की नाही? BCCI ने दिले महत्त्वाचे अपडेट्स

Pune Election : शहरातील क्रीडा संकुल, शाळा-महाविद्यालयांत मतमोजणी केंद्रे तयार!

Maharashtra Police Foundation Day : "शहर सुरक्षेसाठी पोलिस, नागरिकांचा एकत्रित सहभाग महत्त्वाचा"- अमितेश कुमार!

Congress Manifesto: ‘पुणे फर्स्ट’चा नारा! पुण्यासाठी काँग्रेस काय करणार? जाहिरनाम्यात नेमकं काय?

Pune Traffic : "शहरात ‘कमी खर्चाचे’ वाहतूक व्यवस्थापन यशस्वी; कोंडी निम्म्याने कमी"- अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील!

SCROLL FOR NEXT