Kalyan
Kalyan 
मुंबई

स्वातंत्र्यवीर सावरकरांवर होणारी टीका मत्सरापोटी : डॉ. शेवडे

सकाळ वृत्तसेवा

कल्याण : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना विनाविलंब 'भारतरत्न' पुरस्कार देण्यात यावा, लंडन येथील त्यांचे निवासस्थान सरकारने स्मारक म्हणून विकसित करावे, सावरकरांनी लिहिलेले 'जयोस्तुते' हे गीत शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करावे. तसेच शालेय जीवनात किमान एक वर्षासाठी सैनिकी शिक्षण अनिवार्य करावे आणि राष्ट्रपुरुष किंवा क्रांतिकारकांची माध्यमातून होणारी बदनामी ताबडतोब थांबवावी, असे विविध ठराव कल्याण येथे पार पडलेल्या सावरकर साहित्य संमेलनात करण्यात आले.

सावरकर साहित्य अभ्यास मंडळ, मुंबई आयोजित 31 वे अखिल भारतीय सावरकर साहित्य संमेलन आज (रविवार) कल्याण मधील के. सी. गांधी सभागृहात पार पडले. डॉ सच्चिदानंद शेवडे संमेलनाच्या अध्यक्षस्थानी होते. आमदार नरेंद्र पवार संमेलनाचे स्वागताध्यक्ष पदी होते. उद्घाटनाच्या सत्रात महापौर विनिता राणे, अभ्यास मंडळाचे अध्यक्ष शंकर गोखले, माजी आमदार प्रभाकर संत, दि कल्याण जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष सुरेश पटवर्धन तसेच जनकल्याण सहकारी बँकेचे पदाधिकारी भिडे उपस्थित होते.

सावरकरांवर टीका झाल्यामुळे अनेकांनी त्यांच्या चरित्र ग्रंथांचे वाचन सुरू केले. मात्र कोणत्याही राष्ट्रपुरुषाचे किंवा क्रांतिकारकांचे चरित्र वाचताना त्यांचे समग्र वाचन केले जावे, अशी अपेक्षा संमेलनाचे अध्यक्ष डॉ. सच्चिदानंद शेवडे यांनी आपल्या भाषणात व्यक्त केली. आपल्याला जर सावरकर समजून घ्यायचे असतील, तर कोणत्या पुस्तकांचे वाचन करावे याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

सावरकर अभ्यास मंडळाचे अध्यक्ष शंकर गोखले यांनी प्रास्ताविक करताना उपस्थित केलेल्या शंकेचे निरसन करताना डॉ. शेवडे म्हणाले, हिंदू समाज शांतताप्रिय आहे. त्यामुळे सावरकरांच्या विचारांपेक्षा महात्मा गांधींच्या विचारांना त्यांनी अधिक महत्त्व दिले. हिंदू समाजात असलेल्या विविध विचारांच्या गटांनी समन्वय साधत एकत्रित काम करण्याची गरज असल्याचे डॉ. शेवडे यांनी यावेळी व्यक्त केले. शांती आणि शक्ती यांचा संगम साधणाऱ्यांच्या हाती सत्ता देणे अधिक उचित असल्याचेही डॉ. शेवडे म्हणाले. 

सावरकरांवर होणारी टीका मत्सरापोटी केली जात आहे. विरोधकांच्या एका टीकेला उत्तर दिल्यानंतर ते नवीन शंका उपस्थित करतात. रस्त्यावरून हत्ती जाताना कुत्रे भुंकत राहतात, तशीच काहीशी ही स्थिती आहे, अशा शब्दांत शेवडे यांनी सावरकर विरोधकांवर टीकास्त्र सोडले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Revanth Reddy: शहांचा 'तो' व्हिडिओ शेअर करणं भोवलं! तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना चौकशीसाठी दिल्लीला बोलावलं

Rohit Pawar : विधानसभेआधी माझा अरविंद केजरीवाल करतील; आमदार रोहित पवार यांचा खळबळजनक दावा

CSK च्या मिचेलने एक-दोन नाही, तर पकडले तब्बल 5 कॅच अन् IPL मध्ये रचला मोठा विक्रम

Narendra Modi : ''कर्नाटकमध्ये संविधान बदलण्याचा प्रयत्न, परंतु जोपर्यंत मोदी जिवंत आहे तोपर्यंत..'' पंतप्रधान नेमकं काय म्हणाले?

Salman Khan Firing Case : सलमान खान गोळीबार प्रकरणातील चारही आरोपींना मोक्का कोर्टासमोर केलं हजर

SCROLL FOR NEXT