डहाणू ः जमीन ओली असल्यामुळे कोमेजून गेलेली मिरचीची रोपे.
डहाणू ः जमीन ओली असल्यामुळे कोमेजून गेलेली मिरचीची रोपे. 
मुंबई

मिरची उत्पादकांनाही ठसका

सकाळ वृत्तसेवा

डहाणू ः डहाणू तालुक्‍यात गेल्या पाच महिन्यांपासून सतत पडत असलेल्या पावसामुळे; तर कधी ‘क्‍यार’ वादळाच्या प्रभावाने झालेल्या अतिवृष्टीमुळे भातपिकाचे प्रचंड नुकसान होऊन शेतकरी देशोधडीला लागला असतानाच, बागायतीसाठी असलेला रब्बी हंगाम, तब्बल दोन महिने लांबल्याने डहाणू किनारपट्टीच्या भागात घेतल्या जाणाऱ्या ढोबळी मिरची आणि मिरचीचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना नुकसानीचा फटका बसला आहे.

डहाणू तालुक्‍यातील वाणगाव, चिंचणी, वरोर, वाढवण, बावडा, बाडापोखरण, वासगाव, चंडीगाव, ऐना या बागायतसमृद्ध भागात, रब्बी हंगामात इस्रायल तंत्रज्ञानाचा वापर करून अत्याधुनिक पद्धतीने शेडनेटचा वापर करून ढोबळी मिरची आणि मिरचीचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जाते. ही मिरची मुंबई, दिल्ली, गुजरात, परदेशातही पाठवली जाते.

साधारणपणे सप्टेंबरमध्ये पावसाचे प्रमाण कमी झाल्यावर, आधीच शेणखत भरून तयार करून ठेवलेल्या गादीवाफ्यावर, अत्यंत महागड्या मिरची बीजांची पेरणी केली जाते. ही मिरची रोपे वाढवण्यासाठी रासायनिक आणि जैविक खताचा वापर केला जातो. ही मिरची रोपे महिन्याची झाल्यानंतर, त्यांची पुनर्लागवड करणे आवश्‍यक असते. 

यंदा मात्र मिरचीची पुनर्लागवड करण्यात येणारी जमीन सततच्या पावसामुळे ओली राहिल्याने तिच्यात वाफसा आल्यामुळे ती नांगरून लागवडीलायक करता आलेली नाही. त्यामुळे ही रोपे अद्यापही रोपवाटिकेतच आहेत. तसेच वारंवार पडणाऱ्या पावसामुळे रोपांच्या मुळाजवळ सतत पाणी साचत राहिल्याने, मुळांना बुरशी रोगाचा प्रादुर्भाव होऊन यातील काही रोपे कोमेजून गेली आहेत. या बुरशी रोगापासून मिरची रोपांचे संरक्षण करण्यासाठी महागड्या रासायनिक औषधाचा वापर करावा लागत असल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

तब्बल दोन महिने उशीर
डहाणू तालुक्‍यात दरवर्षी ऑक्‍टोबर, नोव्हेंबरपासून रोज ५० टन मिरची उत्पादनाने सुरुवात होऊन त्यानंतर ती रोज दीडशे ते दोनशे टनापर्यंत जाते; यंदा मात्र मिरची लागवडच तब्बल दोन महिने उशिरा होणार असल्याने, रोपांची उंची रोपवाटिकेमध्येच मोठी होऊन त्यांना पिशवीतच फुले येण्यास सुरुवात झाली आहे. त्याचा परिणाम उत्पादनावर होणार असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT