मुंबई

चाळिशीपार पारा अन्‌ फळांचा तोरा! 

सकाळवृत्तसेवा

वाशी -  तापमानवाढीमुळे सर्वत्र उन्हाच्या तीव्र झळा बसत आहेत. उष्माघात टाळण्यासाठी नागरिक थंडगार पेयांना प्राधान्य देऊ लागल्याने घाऊक बाजारात फळांची मागणीही कमालीची वाढली आहे. फळांचा रस आरोग्यास चांगला असून तहानही भागवत असल्याने त्याला मोठी मागणी आहे. नवी मुंबईतील घाऊक बाजारात विविध फळांच्या रोज शेकडो जादा गाड्या येत आहेत. घाऊक बाजारात रोज तीनशे ते साडेतीनशे गाड्या फळे येतात. सध्या फळांची आवक उन्हाळ्यामुळे चारशे ते साडेचारशे गाड्यांवर पोहोचली आहे. सर्वाधिक मागणी कलिंगडाला आहे. 

पावसाळा आणि थंडीच्या दिवसांत फळांचा रस फारसा प्यायला जात नाही. मात्र, उन्हाच्या झळा सुरू होताच रसासाठी फळांची मागणी वाढते. त्यामुळे फळांची बाजारातील आवक आणि मागणी दोन्ही वाढते. सध्या बाजारात सार्वाधिक आवक रसदार फळांची होत आहे. कलिंगडे मोठ्या प्रमाणात येत असून त्याला सर्वाधिक मागणी आहे. रोज बाजारात सहा ते साडेसहा हजार क्विटंल कलिंगड येत आहेत. बुधवारी कलिंगडाची आवक सहा हजार 535 क्विंटल इतकी झाली. त्यापाठोपाठ संत्री आणि मोसंबीची आवक आहे. अडीच ते तीन हजार क्विंटलच्या घरात संत्री-मोसंबी येत आहे. बुधवारी दोन हजार 740 क्विंटल मोसंबी घाऊक बाजारात आली. त्यापाठोपाठ पपई आणि खरबुजाची आवक दोन हजार क्विंटल इतकी आहे. सध्या सव्वा ते दीड हजार क्विंटल काळी आणि हिरवी द्राक्षे येत आहेत. तेवढीच आवक डाळिंबाची आहे. 

ज्यूस सेंटरमधून मोठी मागणी 
उन्हाळ्यात शहरात सर्वत्र फळांच्या रसांची दुकाने थाटली जातात. ज्यूस सेंटरमधून फळांना मोठी मागणी आहे. साहजिकच बाजारात फळांची आवक वाढली आहे. अननसाची मोठ्या प्रमाणात आवक होत असून बुधवारी 450 क्विंटल फळे दाखल झाली. पेरूलाही मागणी असून बुधवारी त्याची 150 क्विंटल आवक झाल्याचे आकडेवारी सांगते. 

घाऊक बाजारातील दर (प्रति किलो/रुपये) 
- कलिंगड 6 ते 9 
- संत्री 20 ते 40 
- मोसंबी 20 ते 34 
- पपई 6 ते 11 
- खरबूज 9 ते 14 
- द्राक्षे 5 ते 55 
- डाळिंब 40 ते 50 
- अननस 20 ते 30 
- पेरू 20 ते 30 
- चिकू 20 ते 30 
- अंजीर 60 ते 80 
- स्ट्रॉबेरी 55 ते 75 
- सफरचंद 70 ते 120 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT