मुंबई

मुंबईत डेंग्यू डासांचा उद्रेक थांबला; कोरोनाकाळात केलेल्या उपाययोजनांना यश

भाग्यश्री भुवड


मुंबई : मुंबईत जून ते डिसेंबर या काळात डेंग्यूचे प्रमाण वाढलेले अनुभवायला मिळते. परंतु 2019 च्या तुलनेत यावर्षी डेंग्यूने ग्रस्त लोकांची संख्या 86 टक्के कमी झाली आहे. आकडेवारीनुसार, डेंग्यू डासांचा उद्रेक आता कमी झाला आहे. याचे सर्वात मोठे कारण पालिकेच्या किटकनाशक विभागाने कडक कारवाई केली आहे.

2020 हे आधीच कोरोनाच्या व्यापात गेले आहे. कोरोनामुळे इतर विविध आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांना बराच काळ उपचारापासून वंचित राहावे लागले आहे. मात्र, डेंग्यू, मलेरिया या डासांचा नाश करणाऱ्या पालिकेच्या किटकनाशक विभागाने स्वच्छतेच्या कामात सक्रिय सहभाग घेतला आहे. अशा परिस्थितीत डासांचा उद्रेक वाढेल आणि रूग्णांमध्येही वाढ होणार असल्याचा अंदाज वर्तवला जात होता, पण मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी म्हणजे मुंबईत डेंग्यूच्या घटनांमध्ये मोठी घट झाली आहे.

2019 मध्ये जानेवारी ते नोव्हेंबर या कालावधीत 881 लोकांना डेंग्यूची लागण झाली होती. तर यावर्षी केवळ 119 लोकांना या आजाराने ग्रासले आहे. त्यामुळे, रुग्णांच्या संख्येत 86.49 टक्क्यांनी घट झाली आहे. पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितले की, किटकनाशक विभागाकडून डासांची पैदास होणारी ठिकाणे योग्य रित्या तपासणी केली गेली आहे.  दुसरे कारण असे आहे कि अनेक घरे बंद होती कारण कोरोनामुळे लोक आपल्या गावी गेले होते. डेंग्यूच्या डासांची पैदास होण्यासाठी स्वच्छ पाणी आवश्यक असते. घरे बंद होती आणि तेथे पाणी साचले नव्हते. त्यामुळे प्रकरणे फारच कमी आढळली. दरम्यान, मुंबईतील ई आणि जी दक्षिण प्रभागात डासांच्या पैदासची सर्वाधिक ठिकाणे आढळली आहेत. डेंग्यूमुळे काही रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागले होते आणि त्यांना गंभीर समस्यांना सामोरे जावे लागले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Toll Hike April 1 : राष्ट्रीय महामार्गांवरील टोलदरात एप्रिलपासून वाढ; राज्यातील नऊ महामार्गांवर दरवाढीचा निर्णय, वाहनचालकांना किती मोजावे पैसे लागणार!

farmer Son Success Story: पळशीतील शेतकऱ्याचा मुलगा झाला कृषी अधिकारी; इच्छापूर्तीसाठी चिकाटीने केला अभ्यास, आई-वडिलांचे स्वप्न झालं पूर्ण!

Beed Fuel Shortage: आता पेट्रोल-डिझेल टंचाईच्या झळा; दोन दिवसांच्या सुट्या, वितरकांना कंपन्यांकडून क्रेडिट बंद; दिलासा मिळण्याची शक्यता

Kolhapur Illegal Gender Test : नाव श्रद्धा पण काम अंधश्रद्धा, उमलणाऱ्या कळ्या खोडणारा डॉक्टर; एजंट ताब्यात, सोनोग्राफी मशीन, गोळ्या जप्त

Pandharpur Vitthal Online Puja Booking : सावळ्या विठ्ठलाची पूजा करायचीय? 'या' तारखेपासून सुरू होतेय ऑनलाईन नोंदणी; जाणून घ्या सविस्तर नियम!

SCROLL FOR NEXT