मुंबई

...तरीही देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री !

सकाळ वृत्तसेवा

थोड्याच वेळात देवेद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिलाय. दरम्यान नवीन मुख्यमंत्री आपला पदभार स्वीकारत नाही तोपर्यंत देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री असतील. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यानी देवेंद्र फडणवीस यांना काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून घोषित केलंय. 

दुपारी अजित पवार यांनी काही कारणांमुळे आपला उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा  देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर केला. यानंतर महाराष्ट्रात पुन्हा एकदा आणखीन एक राजकीय भूकंप आला. यानंतर लगेचच देवेंद्र फडणवीस यांनी संख्याबळ नसल्याच कारण देत मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे सादर केलाय. त्यामुळे जोवर आता महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्री शपथ घेत नाहीत, तोपर्यंत देवेंद्र फडणवीस हे काळजीवाहू मुख्यमंत्री असणार आहेत.  

महाविकास आघाडीची संध्याकाळी हॉटेल ट्रायडेंट एक महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. यामध्ये तीनही पक्षांचे मुख्य नेते उपस्थित असणार आहेत. यामध्ये महाविकास आघाडीचा नेता निवड केली जाणार असल्याची माहिती समोर येतेय. दरम्यान अजित पवार या समारंभाला उपस्थित राहणार का हे देखील पाहणं महत्त्वाचं राहणार आहे.  

या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आता राज्यपाल भगत सिंह कोश्यारी हे शिवसेनेला सत्ता स्थापनेचं कधी निमंत्रण देतात हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे.

विधानसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून भाजपच्या कालिदास कोळंबकर यांची नेमणूक करण्यात आली आहे.   

Webtitle : devendra fadanavis is care taking chief minister of maharashtra

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

Onion Export: केंद्रानं खरंच कांदा निर्यातबंदी उठवली की केवळ निवडणूक जुमला? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT