मुंबई

'सत्ता विसर्जनाचा मुहूर्त त्यांनाच विचारून काढतो'; देवेंद्र फडणवीसांचा स्वकीयांनाच टोला

तुषार सोनवणे

मुंबई - राज्यात मोठ्या राजकीय घडामो़डींनंतर महाविकास आघाडीचं सरकार सत्तेवर आलं. परंतु राज्यातील सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपला सत्ता मिळवता आली नाही. त्यानंतर भाजपच्या अनेक जेष्ठ नेत्यांनी महाविकास आघाडीवर कठोर टीका केल्या. अनेक जणांनी महाविकास आघाडी सरकार जास्त दिवस टिकनार नाही असे कयास लावले आहेत. हे सरकार लवकरच विसर्जित होणार आणि देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार असं भाकीत सातत्याने भाजपच्या ठराविक नेत्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. या नेत्यांचे खुद्द फडणवीस यांनीच कान उपटले आहेत.

महाविकास आघाडीमध्ये अंतर्गत कलह असून, या कलहांमुळेच ठाकरे सरकार पडेल, सरकार लवकर विसर्जित होईल असे नारायण राणे, रामदास आठवले, खासदार गोपाळ शेट्टी अशा नेत्यांनी अनेकवेळा बोलून दाखवले आहे. या नेत्यांचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कान टोचले आहे. 'सत्ता विसर्जनाचा मुहूर्त नेमका कधी काढायचा हे असे वक्तव्य करणाऱ्यांशी चर्चा करूनच ठरवणार असं फडणवीस यांनी म्हटले आहे.

देवेंद्र फडणवीस हे दहिसरमधील सिद्धिविनायक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या आरोग्य महोत्सवात उपस्थित होते. त्यावेळी राज्य विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर देखील उपस्थित होते. राज्यातील सरकार पाडण्याचे मुद्दे गौण असून आमच्यासाठी कोरोनाची लढाई महत्वाची आहे असेही फडणवीस यांनी यावेळी म्हटले. या महोत्सवात बोलताना राज्यातील आवाजावी वीजबिलांच्या वाढीच्या मुद्द्यावरही फडणवीसांनी प्रतिक्रीया दिली

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का! 40 वर्ष ठाकरेंसाठी काम करणाऱ्या नेत्याचा शिंदेसेनेत प्रवेश

PCB T20 WC 24 : वर्ल्डकप सुरू होण्याआधीच हरायची तयारी! गॅरी कर्स्टन बळीचा बकरा... पाकिस्तानचा माजी खेळाडू हे काय म्हणाला?

Crime: माजी मंत्र्याच्या क्रूर मारहाणीत पत्नीचा मृत्यू; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद, लोकांमध्ये संताप

कोल्हापूर लोकसभेची निवडणूक ऐतिहासिक आणि कागल तालुक्याला आव्हान देणारी आहे; असं का म्हणाले मुश्रीफ?

Sucharita Mohanti: काँग्रेसची दुर्दशा सुरूच! आणखी एका उमेदवारानं परत केलं लोकसभेचं तिकीट; कारण ऐकून म्हणाल...

SCROLL FOR NEXT