मुंबई

अंतिम सत्राच्या परीक्षा अडचणीत; मुंबई विद्यापीठातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे सोमवारपासून लेखणी बंद आंदोलन  

तेजस वाघमारे


मुंबई : राज्यातील विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यासह इतर 10 प्रलंबित मागण्यांसाठी राज्यभरातील  अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरु झाले आहे. तरे मुंबई विद्यापीठातील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सोमवारपासून लेखणी बंद आंदोलनास प्रारंभ होणार आहे. राज्यभरातील विद्यापीठांमधील आंदोलनांमुळे राज्यभरातील अंतिम सत्राच्या परीक्षा संकटात आल्या असून निकालावरही याचा परिमाण होणार आहे.

राज्यातील विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा, सेवांतर्गत प्रगती योजना पुनर्जीवित करणे यासह विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन व विद्यापीठीय सेवक कृती समितीमार्फत पाठपुरावा करण्यात येत आहे. यानंतरही सरकारकडून आश्वासनांशिवाय ठोस निर्णय घेण्यात येत नसल्याने राज्यभरातील विद्यापीठांमधील कर्मचाऱ्यांनी पुन्हा आक्रमक भूमिका घेतली आहे. अंतिम सत्राच्या परीक्षा राज्यभरातील विद्यापीठांमार्फत घेण्यात येत असतानाच अधिकारी कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारल्याने याचा परिणाम परीक्षा आणि निकालावर होणार आहे.

मुंबई विद्यापीठ शिक्षक, अधिकारी, कर्मचारी समन्वय समितीमार्फत 28 सप्टेंबरपासून लेखणी बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. यांदोलनादरम्यान कोणताही कर्मचारी कार्यालयीन कामे करणार नाही. परंतु कामावर आल्याची हजेरी लावणार आहेत. या आंदोलनांनंतरही सरकारने मागण्यांबाबत निर्णय न घेतल्यास 1 ऑक्टोबरपासून काम बंद आंदोलन करण्यात येणार आहे. अंतिम सत्राच्या परीक्षा व निकालाची कामे करणारे अधिकारी कर्मचारीच काम बंद आंदोलन करणार असल्याने परीक्षेचे निकालही रखडणार आहेत.

हे आंदोलन सरकारने लादले असून त्याला सरकार सर्वस्वी जबाबदार आहे. विद्यापीठ व महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांच्या प्रलंबीत प्रश्नांची सोडवणूक झाल्याशिवाय हे आंदोलन मागे घेतले जाणार नाही.
- दीपक घोणे,
समन्वय समिती निमंत्रक

------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

S. k. Patil: मुंबईचा अनभिषिक्त सम्राट; तरीही ठाकरे म्हणतात मराठी माणसाचा शत्रू! भाषणात उल्लेख केलेले स. का. पाटील नेमके कोण?

ENGU19 vs INDU19 : तुफान आलया! वैभव सूर्यवंशीचा दरारा, इंग्लंडच्या गोलंदाजांना पुन्हा चोपले, खणखणीत अर्धशतक

Crime News : कसबे सुकेणे हादरले! शाळकरी मुलींच्या अपहरणाचा प्रयत्न, गावकऱ्यांनी आरोपींना दिला चोप

Thane News: मराठीसाठी लढणाऱ्यांवर गुन्हे दाखल झाल्यास स्वराज्य विनामूल्य केस लढणार, ॲड. जय गायकवाड यांची भूमिका

Shravan Pradosh Vrat 2025: यंदाच्या श्रावणात किती प्रदोष व्रत आहेत? जाणून घ्या तारीखा आणि त्यांचे आध्यात्मिक महत्त्व

SCROLL FOR NEXT