मुंबई शहराला पडलीये ग्रामीण भागाची गरज! पालिका मागवणार तज्ज्ञ डॉक्‍टर...
मुंबई शहराला पडलीये ग्रामीण भागाची गरज! पालिका मागवणार तज्ज्ञ डॉक्‍टर... 
मुंबई

मुंबई शहराला पडलीये ग्रामीण भागाची गरज! पालिका मागवणार डॉक्‍टर...

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : कोरोना रुग्णांवरील उपचारांसाठी ग्रामीण भागातील डॉक्‍टर मुंबईत येण्याची शक्‍यता आहे. मे महिन्यांच्या अखेरपर्यंत कोरोनाबाधितांची संख्या अनेक पटींनी वाढण्याची शक्‍यता असल्याने मुंबई महापालिका हा विचार करत आहे. 

सार्वजनिक रुग्णालयांतील अपुऱ्या मनुष्यबळामुळे महापालिकेने तज्ज्ञ व एमबीबीएस डॉक्‍टर कंत्राटी पद्धतीने नेमण्याचा निर्णय घेतला होता. तज्ज्ञ डॉक्‍टरांना दरमहा साडेतीन लाख रुपयांपर्यंत मानधन देण्याची तयारीही महापालिकेने दाखवली होती. परंतु त्यासाठी अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. 
कंत्राटी पद्धतीवरील नियुक्तीला प्रतिसाद मिळत नसल्यामुळे महापालिकेने आता नवा पर्याय पुढे आणला आहे. त्यानुसार जिल्हा सार्वजनिक रुग्णालयांमधील डॉक्‍टरांना मुंबईत बोलावून घेण्याचा विचार प्रशासन करत आहे. महानगरे आणि शहरी भागांत कोरोनाचे रुग्ण जास्त प्रमाणात आहेत. कोरोनाचे अत्यल्प रुग्ण असलेल्या किंवा रुग्ण नसलेल्या जिल्ह्यांतून डॉक्‍टरांना मुंबईत आणण्याचा महापालिकेचा विचार आहे. 

परिचारिका, वॉर्डबॉयचीही गरज 
मे महिन्याच्या अखेरपर्यंत मुंबईत कोरोनाचे 70 हजार रुग्ण आढळण्याची शक्‍यता आहे. विषाणूचा प्रादुर्भाव सुरूच राहणार असल्याने रुग्णांवरील उपचारांसाठी मोठ्या संख्येने डॉक्‍टर, परिचारिका, वॉर्डबॉय आणि अन्य वैद्यकीय कर्मचाऱ्यांची गरज भासणार आहे. कोरोनाच्या बळींमध्ये इतर आजार असलेल्या रुग्णांची संख्या जास्त होती. त्यामुळे महापालिकेला तज्ज्ञ डॉक्‍टरांचीही मोठ्या प्रमाणात आवश्‍यकता आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gautam Gambhir: 'KKR जिंकल्यावर गंभीरचे कौतुक अन् हरल्यावर श्रेयसची चूक?' दिग्गज क्रिकेटरच्या पोस्टने उडवली खळबळ

Radhika Kheda: "मला मद्य पिण्याची ऑफर दिली अन् कार्यकर्ते..."; राधिका खेरांचा काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेवर गंभीर आरोप

Artificial Intelligence in Business: चक्क ९४ टक्के भारतीय प्रोफेशनल्स करतात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, काय आहे कारण ?

The Family Man 3: प्रेक्षकांसाठी खुशखबर! 'द फॅमिली मॅन 3'बद्दल मनोज बाजपेयींनी दिली मोठी अपडेट

Lok Sabha 2024: मतदान केंद्रांना नायलॉनच्या जाळ्यांचे कवच, 101 वाघ असलेल्या जंगलात असं पार पडणार वोटींग

SCROLL FOR NEXT