MLA Atul Bhatkhalkar Sakal
मुंबई

Dombivali News : आदित्य ठाकरेंना बजेट समजत नाही - आमदार अतुल भातखळकर

महाराष्ट्राच्या जखमेवर मीठ चोळण्याच काम बजेटमधून झाले आहे अशी टिका ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी केंद्र सरकारवर केली आहे.

शर्मिला वाळुंज

महाराष्ट्राच्या जखमेवर मीठ चोळण्याच काम बजेटमधून झाले आहे अशी टिका ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी केंद्र सरकारवर केली आहे.

डोंबिवली - महाराष्ट्राच्या जखमेवर मीठ चोळण्याच काम बजेटमधून झाले आहे अशी टिका ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी केंद्र सरकारवर केली आहे. भाजपाचे ज्येष्ठ नेते आमदार अतुल भातखळकर यांनी आदित्य यांना बजेट समजत नाही असे म्हणत त्यांच्या टिकेला उत्तर दिले आहे. देशाचे बजेट जेव्हा मांडले जाते तेव्हा ते देशाकरीता मांडले जाते. मुंबई आणि महाराष्ट्राला पंतप्रधान मोदी यांच्या 9 वर्षाच्या कालखंडात जितके मिळाले तितके मुंबई आणि महाराष्ट्राच्या इतिहासात मिळाले नव्हते हे आदित्य यांना पुरेसे माहित आहे असे विधान भातखळकर यांनी डोंबिवली येथे केले.

भारतीय जनता पार्टी कल्याण जिल्हा यांच्या वतीने ज्येष्ठ नेते आमदार अतुल भातखळकर यांचे अर्थसंकल्पीय सत्र या कार्यक्रमाचे डोंबिवलीत आयोजन केले होते. यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी भातखळकर डोंबिवलीत आले होते. पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर दिली. केंद्र मंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर ठाकरे गटाचे नेते आदित्य यांनी बजेट मधून महाराष्ट्राला दिल्लीसमोर झुकतं माप दिले आहे अशी टिका केंद्र सरकारवर केली होती. त्यावर आमदार म्हणाले, आदित्य ठाकरे यांना बजेट समजत नाही. मुळात देशाचे बजेट जेव्हा मांडले जाते तेव्हा ते देशाकरीता मांडले जाते. मुंबई शहरामध्ये फडणवीस यांच्या काळात 314 किमीचा मुंबई आणि एमएमआर रीजन मध्ये मेट्रोचे जाळे निर्माण करायला प्रारंभ केला, हे कोणामुळे शक्य झाले? हा प्रकल्प केंद्र आणि राज्य सरकार यांचा मिळून आहे.

केंद्र सरकारमुळे म्हणजेच पंतप्रधान मोदी यांच्यामुळे या मेट्रो प्रकल्पाला जपानच्या बॅंकेने 1 टक्के चे सॉफ्ट लोन दिले. त्याचवेळेला मुंबई शहरातील वाहतुकीची समस्या सोडविणारा दुसरा उपाय न्हावा शेवा शिवडी पार बंदर प्रकल्प, याला सुद्धा जपान बॅंकेने कर्ज दिले. त्याच्यामुळे मुंबई आणि महाराष्ट्राला मोदीजींच्या 9 वर्षाच्या कालखंडात जितके मिळाले तितके मुंबई आणि महाराष्ट्राच्या इतिहासात मिळाले नव्हते हे आदित्य ठाकरे यांना देखील पुरेसे माहित आहे. ज्या कोस्टल रोडचे ते कौतुक करतात त्या कोस्टल रोडच्या परवानग्या या कोणी दिल्या केंद्र सरकारने दिल्या त्याच्यामुळे या अर्थसंकल्पात महाराष्ट्राला, मुंबईला, एमएमआररीजनला फार मोठी मदत मोदी सरकारने केलेली आहे.

मुंबई महापालिकेत लोकप्रतिनिधी नसतानाही पूर्ण अर्थसंकल्प सादर होणार असल्याने शिवसेना नेते अनिल परब यांनी नाराजी व्यक्त केली आहे. पूर्ण अर्थसंकल्प सादर झाल्यास आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला आहे. यावर भाजपा आमदार भातखळकर म्हणाले, मुंबई महानगरपालिकेत आयुक्तांचे राज्य आहे. आयुक्त जे करतील ते अंतिम असेल त्यामुळे त्याच्यावर आंदोलन करण्याची भाषा कोणी करु नये. कारण मुंबईकरांना विकास महत्वाचा आहे, आणि त्यामुळे पूर्ण अर्थसंकल्प मांडू देणार नाही म्हणजे काय? तुम्ही सत्तेत असताना विकास कामे केली नाहीत, विकास कामे कधी पूर्ण होऊ दिली नाही. आणि आता अर्थसंकल्पही पूर्ण होऊ देणार नाही म्हणतात हे अत्यंत हास्यास्पद आहे आणि जनता विरोधी आहे.

शिक्षक पदवीधर मतदार संघात कोकणातील जागा मिळविली परंतू नागपूर येथे पराभव पत्करावा लागला आहे, याविषयी आमदार म्हणाले, कोकणातील जागा जी पूर्वी शेकापकडे होती, ती आम्ही खेचून घेतली. नागपूर मध्ये पराभव झाला ही वस्तूस्थिती आहे. त्याचे आत्मचिंतन आम्ही करु. पण नागपूर मधील उमेदवार भारतीय जनता पार्टीचा नसून भाजपा समर्थित होता. शिक्षक परिषद ही निवडणूक लढविते तरीसुद्धा भारतीय जनता पार्टी या निकालाचा आत्मचिंतन करेल.

यंदाच्या अर्थसंकल्पाविषयी ते म्हणाले. यावेळचा अर्थसंकल्प हा केवळ मध्यमवर्गीयांना नाही तर समाज जीवनातल्या सर्व घटकांना अत्यंत दिलासा देणारा आणि कोविडच्या परिस्थितीतून बाहेर येऊन देशाला प्रगतीपथावर नेणारा रोजगार देणारा असा अर्थसंकल्प आहे. मध्यमवर्गीयांसाठी सात लाखाची इनकम टॅक्सची स्लॅप करुन मोठा दिलासा दिलाच आहे. पण त्याच वेळेला ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेली सिनिअर सिटीझन स्कीम ही थेट 30 लाखापर्यंत केली. त्यामुळे मला असे वाटते समाजातील सर्व घटकांना दिलासा देणारा आणि भारताच्या अर्थव्यवस्थेला गती देणारा असा हा प्रकल्प आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abu Azmi Vs MNS : Video - ‘’रिक्षावाले, फेरीवाल्यांना काय मारता, मारायचंच आहे ना, तर..’’ ; अबू आझमींनी ‘मनसे’ला ललकारलं!

IND vs ENG 2nd Test: शुभमनच्या २६९ धावा अन् नंतर आकाश दीपचा भेदक मारा! इंग्लंडच्या संघाची घरच्या मैदानावर झालीय वाईट अवस्था

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

SCROLL FOR NEXT