Mla Raju Patil
मुंबई

MLA Raju Patil : एप्रिल पर्यंत 27 गावात अमृत योजना कार्यान्वित होईल

२७ गावातील नागरीकांना पाणी प्रश्नावर लवकर मिळणार दिलासा.

शर्मिला वाळुंज

डोंबिवली - अमृत योजनेत डीपीआर तयार न करता फक्त टेंडर काढण्याचे काम केले गेले. पाण्याच्या टाक्यांचे कुठे उभारायच्या ही बाब निश्चित नव्हती. ज्या जागांचा सर्व्हे होता त्या जागा ताब्यात नव्हत्या, अशा अनेक अडचणी समोर होत्या. सगळं अंदाधुंद काम सुरु होते.

ढिसाळ नियोजन व काही नी खोडा घातल्याने हे काम थंडावले. मात्र आत्ता कामाची परिस्थिती समाधान कारक असून येत्या एप्रिल पर्यंत अमृत योजना कार्यान्वीत होईल असा विश्वास कल्याण ग्रामीणचे मनसेचे आमदार राजू पाटील यांनी व्यक्त केला.

कल्याण ग्रामीणमध्ये अनेक ठिकाणी अमृत पाणी पुरवठा योजनेचे काम सुरु आहे. मात्र या कामात दिरंगाई होत असल्याने नागरीकांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. मनसेचे आमदार राजू पाटील यांनी योजनेच्या कामावर प्रश्न उपस्थित करीत ही कामे जलद गतीने पार पाडली जावीत यासाठी पाठपुरावा केला आहे. बुधवारी आमदार राजू पाटील यांनी अधिकारी वर्गासोबत सुरु असलेल्या योजनेच्या कामाची पाहणी केली.

सध्या सुरु असलेल्या कामाविषयी समाधान व्यक्त केले आहे. या कामा दरम्यान ढिसाळ नियोजन आणि मुद्दाम कामे थांबविली गेल्याने ही योजना संथ गतीने सुरु होती याकडे त्यानी लक्ष वेधले. आत्ता ज्या प्रकारे कामे सुरु आहे. एप्रिल अखेरपर्यंत ही योजना कार्यान्वीत होईल असा विश्वास आमदार राजू पाटील यांनी व्यक्त केला आहे.

हरियाणीतील जादू महाराष्ट्रात चालते का पहावे लागेल

हरियाणा येथील निवडणूक निकालावर बोलताना आमदार पाटील म्हणाले, हरियाणा आणि जम्मू काश्मीर येथील निवडणूक पाहता जम्मू काश्मीर मध्ये निकाल अपेक्षित होता. पण हरियाणात भाजप येईल असे वाटले नव्हते. हरियाणात भाजपने काय जादू केली आहे, ते माहीत नाही. महाराष्ट्रात ही जादू चालते का हे पाहावे लागेल असे ते म्हणाले.

दीपेश यांचा ठाकरे गटातील प्रवेश जाणून बुजून

ठाकरे गटात इतर पक्षाच्या नेत्यांची एंट्री सुरु झालेली आहे. डोंबिवलीतील शिवसेना शिंदे गटाचे दीपेश म्हात्रे यांनी ठाकरे गटात प्रवेश केला आहे. या प्रश्नावर आमदार पाटील यांनी सांगितले की, काही लोक बोलतात की, जाणूनबुजून हे सगळे पेरले गेले आहे.

तथ्य निवडणूकीच्या निकालानंतर समजणार आहे. म्हणजे दीपेश म्हात्रे यांच्यासह त्यांच्यासोबत गेलेल्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना शिवसेना शिंदे गटाकडून जाणूनबुजन पाठविले गेले आहे का असा सवाल आत्ता उपस्थित होत आहे. मंत्री रविंद्र चव्हाण यांना आव्हान देण्यासाठी ही रणनिती आखली गेली आहे का ?या प्रश्नाचे उत्तर निवडणूकीच्या निकालानंतर समजणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भारताने Asia Cup जिंकल्यानंतर पाकिस्तानमध्ये अफगाणी विद्यार्थ्याने दिल्या 'जय हिंद'च्या घोषणा! Video Viral

JNU Ravan Dahan controversy : उमर खालिद अन् शरजीलचे फोटो पुतळ्यावर लावून 'जेएनयू'मध्ये झाले रावणाचे दहन!

Uddhav Thackeray: राज ठाकरेंसोबत युती आहे की नाही? दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी थेट उत्तर देत विषयच संपवला, म्हणाले...

World Cup 2025: पाकिस्तानची पहिल्याच सामन्यात दयनीय अवस्था! आधी १२९ वर ऑलआऊट केलं अन् मग बांगालादेशनं गोलंदाजांनाही झोडलं

Talegaon Dhamdhere News : आठवीत शिकणाऱ्या शेतमजुराच्या अल्पवयीन मुलाने गळफास घेऊन संपविले जीवन

SCROLL FOR NEXT