MNS MLA Raju Patil sakal
मुंबई

MLA Raju Patil : बाळासाहेबांचे स्मारक राज यांच्याशिवाय दुसरं कोणी बनवू शकत नाही

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक खरोखरच चांगले आणि योग्य करायचे असेल तर ते राज ठाकरे यांच्या व्हिजनने व्हावे.

शर्मिला वाळुंज

डोंबिवली - हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक खरोखरच चांगले आणि योग्य करायचे असेल तर ते राज ठाकरे यांच्या व्हिजनने व्हावे. राज यांच्याशिवाय दुसरं कोणी ते बनवू शकत नाही. त्यामुळे त्यांचा विचार घ्यायला हरकत नाही असे स्पष्ट मत मनसेचे आमदार राजू पाटील यांनी व्यक्त केले आहे.

काही दिवसांपासून उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांना शिवसेना प्रमुख हिंदुहृदयसम्राट दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारक उभारणी संदर्भात संपर्क करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. यावर मनसेचे आमदार पाटील यांनी राज यांच्याशिवाय दुसरे कोणी चांगले व योग्य स्मारक उभारू शकत नाही असे स्पष्टच सांगून टाकले.

ठाकुर्ली येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदीप चौधरी यांच्या शाखेचे उद्घाटन सोहळा प्रसंगी आमदार पाटील उपस्थित होते. यावेळी प्रकाश भोईर, मनोज घरत, संदीप म्हात्रे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

बाळासाहेब स्मारक वरून सुरू असलेल्या चर्चा विषयी आमदार पाटील म्हणाले, राज ठाकरे यांच्याकडे बाळासाहेब ठाकरे यांच्या पूर्वीच्या भाषणाच्या काही क्लिप आहेत. राज यांचे वडील श्रीकांत ठाकरे यांनी ते संग्रहित करून ठेवल्या आहेत. आणि अशी देखील माहिती मिळते की राज यांनी तो संग्रह उद्धव यांना दिला पण होता.

माझी अशी मागणी आहे की बाळासाहेबांचे स्मारक खरोखरच चांगले करायचे असेल तर राज यांच्या व्हिजनने विचारांनी व्हायला पाहिजे. राज्यातील बाळासाहेबांच्या नावाचे पहिले स्मारक नाशिक मध्ये आहे. तेथे शस्त्रांचे प्रदर्शन लावण्यात आले आहे.

तेव्हा देखील राज ठाकरे असे बोलले होते की बाळासाहेबांचे स्मारक असे असले पाहिजे की त्यातून शस्त्र बाहेर आली पाहिजे. याच प्रकारे येथे वेगळे विचार घेऊन बाळासाहेबांची भाषण कशी होती, शैली कशी होती, हे पाहिले पाहिजे. राज यांच्याशिवाय दुसरं कोणी बनवू शकत नाही. त्यांचा विचार घ्यायला हरकत नाही.

पत्रकाराला मारहाण होते ही बाब दुर्दैवी

गेले दोन अडीच वर्षे तुम्ही पहाल पूर्वीचे सरकार आणि आत्ताच सरकार पोलीस यंत्रणांचा वापर गैरवापर, संस्थांचा वापर गैरवापर करतात. गुंडशाही जांच्यावर केसेस आहेत त्यांना पक्षप्रवेशाचा क्रायटेरिया बनविला जातो. अशा गोष्टी होत असताना कोणी पक्षावर टीका केली तर त्यांना मारहाण होते हे दुर्दैवी आहे.

आजकाल सोशल मीडियावर एखाद दुसरा पक्षाचा कार्यकर्ता बोलत असेल त्याला मारहाण होते. आता पत्रकारांवर पण हीच वेळ आली आहे. ही अत्यंत गंभीर बाब आहे. पत्रकारांनी सुद्धा या गोष्टींचा निषेध केला पाहिजे. पक्ष कोणताही असो परंतु अशा गोष्टी खपवून घ्यायला नाही पाहिजे.

भाजप महिला खासदाराने विषय डायव्हर्ट करण्यासाठी केलेला गलिच्छ आरोप राहुल गांधीच भाषण मीही पाहत होतो. त्यांनी जे भाषण संपल्यावर हातवारे केले मला वाटत नाही की ते फ्लाईंग किस होतं. मणिपूर येथे महिलांवर अत्याचार झाला त्याबद्दल विषय सुरू होता.

भाजपच्याच एक महिला खासदार त्यांनी हा विषय डायव्हर्ट होण्यासाठी केलेला गलिच्छ आरोप आहे असं माझं वैयक्तिक मत आहे.

केंद्रीय निवडणूक आयोग ठराव समिती रचनेविषयी आमदार पाटील म्हणाले, अनेक ज्या संस्था आहेत ज्या ठिकाणी न्यायाधीश असतील इतर लोक असतील यांची नियुक्ती होणे अपेक्षित असते मात्र आता या संस्थेचा लोकशाही म्हणून त्यांचं अस्तित्व आहे त्याचाही गळा घोटण्याचा प्रकार सुरू आहे. वॉर्ड फॉर्मेशन जे असते ते पूर्वी निवडणूक आयोग करायचे.

मात्र मागच्या अधिवेशनात ते अधिकार राज्य सरकारकडे पारित करून घेतले की ते अधिकार राज्य सरकारकडे असले पाहिजे. म्हणजे जो सत्तेत असेल तो त्याच्या मनमानीप्रमाणे वॉर्ड रचना करू शकतो हा त्याचा सरळ अर्थ आहे. आशा प्रकारे या संस्था वेठीस धरून आपला उद्देश कसा साध्य करता येईल हे पाहिले जाते. याच्यापाठी सत्ताधारी पक्ष असतो मग तो राज्यातील असो किंवा केंद्रातील असतील. जोपर्यंत सत्ता आहे तोपर्यंत करणार हे.

राष्ट्रवादीच्या व्हीप बाबत बोलताना आमदार पाटील म्हणाले, प्रत्येक पक्षाची विचारधारा आहे मात्र एनसीपी च बघाल तर अजितदादा महाराष्ट्रात ते स्टेज शेअर करतात. अर्थात ते सत्तेत आहेत. तिकडे सुप्रियाताई भांडतात एकंदरीत हा थोडा घोळच आहे.

अधिवेशन झाल तरी आम्हाला कळलच नाही की यांचं काउंट किती. एनसीपीचे विरोधात किती बसले आहेत सत्तेत किती आहे ते शेवटपर्यंत कळालं नाही. त्यामुळे हे पवार साहेबांचे राजकारण आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

IND vs ENG 2nd Test: 5/84 ते 5/385! हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ यांच्या १५० धावा; १४८ वर्षांच्या इतिहासात जे कधीच घडले नव्हते ते इंग्लंडने केले

Kondhwa Crime : कोंढवा लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या ताब्यात; आरोपी कुरिअर बॉय नसून, आयटी अभियंता

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला चीनची सक्रिय मदत; लष्कर उपप्रमुखांची माहिती

SCROLL FOR NEXT