Baravi Dam Water sakal
मुंबई

Thane Rain Update : ठाणे जिल्ह्याला दिलासा! बारवी धरण 56 टक्के भरले; एकाच दिवसात 275 मिमी पाऊस

अंबरनाथ, बदलापूर परिसरासह बारवी धरण परिसरात गेल्या चोवीस तासात समाधान कारक पाऊस पडला असून बारवी धरण अर्धेअधिक भरले आहे.

शर्मिला वाळुंज

डोंबिवली - अंबरनाथ, बदलापूर परिसरासह बारवी धरण परिसरात गेल्या चोवीस तासात समाधान कारक पाऊस पडला असून बारवी धरण अर्धेअधिक भरले आहे. एकाच दिवसात बारवी धरणात तब्बल 32 दशलक्ष घनमीटर पाण्याची भर पडली आहे. बुधवारी दुपारी बारवी धरणात 157.68 दलघमी पाणीसाठा होता.

तर गुरुवारी सकाळ पर्यंत त्यात मोठ्या प्रमाणात पाण्याची भर पडून साठा 189.25 दलघमी पर्यंत पोहोचला आहे. दहा दिवसांपूर्वी बारवी धरणात 40 टक्के पाणीसाठा होता. दहा दिवसांत तसेच गेल्या 24 तासात पडलेल्या पावसाने बारवी धरण 56 टक्के भरले आहे.

एमआयडीसीच्या बारवी धरणातून ठाणे जिल्ह्यातील मीरा भाईंदर, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी या महापालिकांसह अंबरनाथ, बदलापूर नगरपालिका आणि ग्रामपंचायतीचा समावेश आहे. तसेच ठाणे जिल्ह्यातील बदलापूर, अंबरनाथ, डोंबिवली, ठाणे येथील औद्यागिक क्षेत्रालाही बारवी धरणातून पाणी पुरवले जाते. त्यामुळे या धरणातील पाणीसाठा एकूणच जिल्ह्याच्या व्यवस्थापनासाठी महत्त्वाचा आहे.

यंदाच्या वर्षात बारवी धरणाची पाणी पातळी खालावली होती. त्यामुळे जून महिन्यापासून जिल्ह्यात दर पंधरा दिवसांनी एक दिवस पाणी कपात केली जात होती. मात्र जून महिन्याच्या अखेरीस पावसाने हजेरी लावल्याने दिलासा मिळाला होता. पाऊस पडत असला तरी बारवी धरणाची पाणी पातळी संथगतीने वाढत होती.

दहा दिवसांपूर्वी बारवी धरणात 39 टक्के पाणीसाठा होता, 16 जुलैला या साठ्यात अवघ्या एक ते दिड टक्कयाने वाढ होत 40.87 टक्के पर्यंत पाणीसाठा झाला. यामुळे पाणी टंचाईची समस्या भेडसावण्याची शक्यता वर्तविली जात होती. मात्र काल दिवसभरात पडलेल्या पावसाने पाण्याची चिंताच मिटवून टाकली आहे.

भारतीय हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार मंगळवारपासून जिल्ह्यात जोरदार पावसाला सुरुवात झाली. बारवी धरण परिसरात देखील समाधान कारक पाऊस झाला आहे. दिवसभरात बारवी धरण परिसरात 275 मिमी पावसाची नोंद झाली असून आत्तापर्यंत 1 हजार 286 मिमी पाऊस झाला आहे.

बुधवारी 24 तासांच्या कालावधीत बारवी धरणक्षेत्रात मोठा पाऊस झाला. एका दिवसात बारवी धरणात तब्बल 32 दशलक्ष घनमीटर पाण्याची भर पडली आहे. बुधवारी बारवी धरणात 46 टक्के पाणीसाठा होता तर धरणात 157.68 दशलक्ष घनमीटर पाणी होते.

गुरुवारी बारावी धरण क्षेत्रात 275 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्यामुळे बारावीचा पाणीसाठा ४६ टक्क्यांवरून थेट 56 टक्क्यांवर पोहोचला आहे. सध्याच्या घडीला धरणात 189.25 दशलक्ष घनमीटर पाणीसाठा आहे. त्यामुळे जिल्ह्याची जलचिंता काही अंशी मिटली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Subhanshu Shukla meet PM Modi : शुभांशू शुक्ला यांनी पंतप्रधान मोदींना दिली ‘ती’ खास भेटवस्तू ; जाणून घ्या, मोदी काय म्हणाले?

Nanded Rain : मुखेडमध्ये ३०० जणांना वाचविले; नांदेडमध्ये पावसाचा धुमाकूळ, ९ जण बेपत्ता, म्हशींसह ७० जनावरे गेली वाहून

Eleventh Admission : अकरावीच्या ‘सर्वांसाठी खुल्या’ फेरीअंतर्गत प्रवेशासाठी २२ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

Pune News : नेत्यांची वेळ न मिळाल्याने पुण्यातील उड्डाणपुलांचे उद्‍घाटन रखडले

इतिहासाची अमूल्य खुण भारतात! इतिहासाशी पुन्हा जोडणारा क्षण, मुख्यमंत्री फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT