Electricity
Electricity 
मुंबई

मुंबई बुधवारपासून अंधारात जाणार?

सकाळवृत्तसेवा

रक्कम थकवल्याने टाटा पॉवरचा बेस्टला वीज विक्री थांबवण्याचा इशारा
मुंबई - बेस्ट उपक्रमाने टाटा वीज कंपनीचे वीज खरेदीपोटी देय असलेले तब्बल ५६१.५८ कोटी रुपये थकवले आहेत. ही रक्कम थकवल्याने टाटा कंपनीने बेस्ट उपक्रमास नोटीस बजावली असून तातडीने पैसे न भरल्यास मंगळवार (ता. २१) पासून विजेची विक्री बंद करण्याचा इशारा टाटाने दिला आहे. यामुळे मंगळवार मध्यरात्रीपासून शहरातील काही भाग अंधारात बुडण्याची भीती आहे.

शहरात बेस्ट उपक्रमामार्फत वीजपुरवठा करण्यात येत आहे. यासाठी टाटा वीज कंपनीकडून वीज खरेदी करण्यात येते. वीज खरेदीबाबत टाटा आणि बेस्टमध्ये करार झाला आहे. बेस्ट उपक्रमाने डिसेंबर २०१८ ते एप्रिल २०१९ या कालावधीत केलेल्या वीज खरेदीचे पैसे टाटा वीज कंपनीला दिलेले नाहीत. ही रक्‍कम तब्बल ५६१ कोटी ५८ लाख रुपये आहे. काही महिन्यांपासून बेस्टकडून पैसे देण्यात येत नसल्याने टाटाने २१ मे रोजी मध्यरात्रीपासून बेस्ट उपक्रमाला विजेची विक्री करण्यात येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच निर्माण होणाऱ्या परिस्थितीस टाटा वीज कंपनी जबाबदार नसेल, असेही या नोटीसमध्ये स्पष्ट केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kasparov on Rahul Gandhi: माजी बुद्धिबळ चॅम्पियन गैरी कास्परोवनं केलं राहुल गांधींना ट्रोल म्हणाला, आधी रायबरेली...

Unnatural Sex: "पत्नीसोबत अनैसर्गिक लैंगिक संबंध बलात्कार नाही"; हायकोर्टाचं विधान!

Sharad Pawar: सोडून गेलेल्यांबाबत तडजोड नाही, पवार थेटच बोलले; वाचा महत्वपूर्ण मुलाखत

IPL Toss Fixing : कॅमेरा टॉसकडे जाताच रेफ्री आला मध्ये; मुंबईचा टॉस पुन्हा वादात, व्हिडिओ होतोय व्हायरल

Latest Marathi News Live Update : रविवारी मध्यरेल्वेवर मेगाब्लॉक; प्रवाशांचे होणार हाल !

SCROLL FOR NEXT