BMC sakal media
मुंबई

BMC: पैसे घेऊन अभियंत्यांची बढती केली, काँग्रेसचा आरोप

- समीर सुर्वे

मुंबई : महानगरपालिकेच्या (BMC) 132 अभियंत्यांना बढती देण्याचा प्रस्ताव स्थापत्य समितीत मंजूर झाला आहे. मात्र,पैसे घेऊन(Money) ही बढती झाली असल्याचा आरोप कॉंग्रेसने(Congress) केला आहे. कोणतीही चर्चा न करता हा प्रस्ताव मंजूर करण्यात आल्याचा आरोप कॉंग्रेसने केला आहे. शिवसेनेने (Shivsena) हे आरोप फेटाळले आहेत. ( Engineer promotion scam allegation of congress to shivsena-nss91)

महानगर पालिकेच्या 132 अभियंत्यांना बढती देण्याचा प्रस्ताव स्थापत्य समितीत गरुवारी मंजूर झाला.हे सर्व अभियंते पदवीका प्राप्त आहेत.मात्र,अभियंात्रिकीची पदवी असलेल्या 102 अभियंत्यांना या बढतीत डावलण्यात आल्याचा आरोप विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केला.महापालिकेची सोमवारी महासभा होणार आहे.त्यावेळी हा प्रस्ताव चर्चेसाठी येणार आहे.त्यावेळी याबाबत भुमिका मांडू असेही रवी राजा यांनी सांगितले.

स्थापत्य समितीच्या ऑनलाईन कामकाजाची लिंक विलंबाने मिळाली.त्यामुळे कॉंग्रेसचे सदस्य सुफियाणू वणू जेव्हा या बैठकीत सहभागी झाले तेव्हा बैठकीचा शेवट होत होता.जाणून बुजून विलंबाने लिंक देण्यात आली असा आरोपही करण्यात आला.कॉंग्रेसने कामकाज संपल्यानंतर या प्रस्तावावर आक्षेप घेतला.नियमानुसार बैठकीची लिंक योग्य वेळेत पाठविण्यात आली होती.यात कोणताही गैरव्यवहार झालेला नाही.नियमानुसार हा प्रस्ताव मंजूर झाला आहे.असे स्थापत्य समिती शहरचे अध्यक्ष दत्ता फोंगडे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Shetty : रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार, आणखी चौघांना अटक; मोबाईलसह महत्त्वाचे पुरावे हाती

Nashik Ration Shops : ग्रामपंचायती अन् बचत गटांची प्रतीक्षा संपणार कधी? नवीन रेशन परवान्यांसाठी नाशिककर आक्रमक

Pune News: वारज्यात महामार्गाचीच कोंडी! दीड किलोमीटर अंतर पार करण्यासाठी लागतो दीड तास; काय आहेत काेंडीची कारणे..

फक्त एका मालिकेमुळे रातोरात प्रसिद्ध झाली अभिनेत्री नंतर अचानक झाली गायब; आता ओळखणंही झालं कठीण

Latest Marathi News Update : नागपूर विमानतळावरील सुरक्षा मशिन्स पूर्ववत सुरू

SCROLL FOR NEXT