mumbai sakal
मुंबई

२०५० पर्यंत दक्षिण मुंबईचा मोठा भाग पाण्याखाली जाण्याची भीती

दक्षिण मुंबईतील मोठा भाग २०५० पर्यंत पाण्याखाली जाण्याची भीती तज्ज्ञांकडून वेळोवेळी व्यक्त

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : दक्षिण मुंबईतील (South Mumbai) मोठा भाग २०५० पर्यंत पाण्याखाली जाण्याची भीती तज्ज्ञांकडून वेळोवेळी व्यक्त केली जात आहे. या इशाऱ्याची दखल पालिकेने (Municipal) घेतली आहे. मुंबईला (Mumbai) वाचविण्यासाठी आतापासूनच प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल (Iqbal Singh Chahal) यांनी शुक्रवारी केले.

मुंबई शहराचा पर्यावरण कृती आराखडा तयार होत आहे. असा आराखडा तयार करणारे मुंबई हे दक्षिण आशियातील पहिले शहर आहे, असे आयुक्तांनी सांगितले.

‘३१ वर्षांच्या सनदी सेवेत चक्रिवादळाचा फटका मुंबईला बसल्याचे मी पाहिले नव्हते. १२९ वर्षांनी चक्रिवादळ मुंबईच्या जवळ आले. तर, १५ महिन्यांच्या काळात तीन चक्रीवादळे मुंबई किनारपट्टीच्या जवळ आली. पाऊसही लहरी झाला आहे. महिन्याच्या सरीसरीचा पाऊस दोन चार दिवसांत कोसळतो. १९९० पासून वातावरणातील बदलाची चर्चा सुरू आहे. पण, आतापासून उपाययोजना आवश्यक असल्याचे ते म्हणाले. आगामी २५ ते ३० वर्षे धोकादायक आहेत. त्या दृष्टीने नियोजनाच्या गरजेवर त्यांनी भर दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मनोज जरांगे पाटलांनी मध्यरात्री उपोषण सोडलं, सरकारने मागण्या केल्या मान्य; विखे-पाटील म्हणाले, चर्चा यशस्वी

Gold News: सोनं महागलं, आता ड्युटीचाही भार! सरकारच्या 'या' एका निर्णयाने सोन्याची चमक फिकी; खरेदीत तब्बल ७०% घट

IPL 2026 फायनलच्या २४ तासांपूर्वीच गुजरात टायटन्स संघ अडचणीत सापडला! अहमदाबादला पोहोचण्यास उशीर होणार; चिंता वाढली

Cotton Import Duty Waiver : कापूस आयातीवरील 11 टक्के सीमा शुल्क पूर्णपणे माफ; केंद्र शासनाकडून अधिसूचना जारी, वस्त्रोद्योगाला मोठा दिलासा

Raigad Infrastructure Upgrade: पालीकरांचे स्वप्न साकार; पाली-सुधागड एसटी बसस्थानक पुनर्विकासासाठी १४ कोटींची मंजुरी, तीन महिन्यांत भूमिपूजन

SCROLL FOR NEXT