fear of landslide in bhandup Sakal
मुंबई

Mumbai News : भांडुपमध्ये दरड कोसळण्याची भीती कायम!

माळीण गाव किंवा इर्शाळवाडीसारखी घटना घडण्याची भीती नागरिकांच्या मनात.

सकाळ वृत्तसेवा

Mumbai : भांडुप येथील खिंडी पाडा परिसरात ४०० ते ४५० घरे आहेत; तर रावते कपाउंड, हनुमान टेकडी, रमाबाई नगर, गावदेवी टेकडीसह नगरदास परिसरात १० हजार घरे आहेत. या परिसरातील शेकडो घरे दगड खाणीत बांधली आहेत. रमाबाई नगरजवळील संरक्षक भिंत जीर्ण झाली आहे. मोरोडो हिलजवळ संरक्षक भिंतीचे बांधकाम अर्धवट आहे.

त्यामुळे येथे माळीण गाव किंवा इर्शाळवाडीसारखी घटना घडण्याची भीती नागरिकांच्या मनात आहे. या भागात अनेक ठिकाणी संरक्षक भिंत बांधलेली नाही; तर काही ठिकाणी बांधली, मात्र ती अपूर्ण आहे.

पावसाळ्यात येथील रहिवाशांना केवळ नोटिसा येतात. कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यात प्रशासनाला रस नाही. घटना घडली की प्रशासन केवळ सांत्वन करण्यास येते.

- पवन कुमार बोराडे, सामाजिक कार्यकर्ते

गेल्या आठवडाभरापासून आम्ही दरडीच्या भीतीने रात्र जागून काढत आहोत. कामावर गेले तरी घरीच जीव गुंतून राहतो. कामावरून घरी आल्यावर रात्रभर जागावे लागते. जगावे की मरावे हे कळत नाही.

- कुंडलिक खरात, रहिवासी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT