मुंबई : राज्य सरकारने मंदिर उघडण्याऐवजी दारूची दुकाने उघडली आहेत. उद्धवजी ठाकरे तुम्ही मित्र बदलले. पण, तुम्ही देव ही बदलले, अशी टीका माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केली. महाराष्ट्र राज्य भाजप कार्यकारिणीच्या बैठकीत फडणवीस बोलत होते. राज्यात कोरोनामुळं 39 हजार जणांचा मृत्यू झाला असताना, मंत्र्यांना झोप कशी लागते, असा प्रश्नही त्यांनी या वेळी उपस्थित केला.
मुंबईच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'राज्यात सध्या एकच धंदा सुरू आहे तो म्हणजे बदल्यांचा. राज्य सरकार प्रेताच्या टाळूवरचं लोणी खाण्याचं काम सरकार करत आहे. कोरोनामध्ये लोक मरत असताना भ्रष्टाचार सुरू आहे. कोणी विचार करू शकतो का? महाराष्ट्रात बलात्कार सुरू आहेत. कोविड सेंटरमध्ये बलात्काराच्या घटना होत आहेत. महाराष्ट्राची बदनामी सरकारच्या निष्क्रयतेमुळे होत आहे. हाथरसच्या घटनेचा निषेध करायला सर्व जण रस्त्यावर आहेत. राजस्थानमध्ये दलित भगिनीवर अत्याचार झाला तेव्हा कुठे होता तुम्ही? महाराष्ट्रातील गृहमंत्र्यांना हाथरसची घटना दिसते महाराष्ट्राचं का?' हिंगनघाटला मुलीला जाळण्यात आलं का नाही तुम्ही गेला, असा प्रश्न फडणवीस यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना केला. सरकार महिलांच्या सुरक्षेबाबत निष्क्रीय आहे, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी या वेळी केली.'
पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.