culprits arrested
culprits arrested sakal media
मुंबई

वीरभूम हिंसाचार प्रकरणी चौघांना मुंबईतून अटक

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : पश्चिम बंगालमधील वीरभूम हत्याकांडातील (Birbhum Kiling case) चार संशयितांना सीबीआयने आज (ता. ७) मुंबईतून (Four suspected arrested) अटक केली. बाप्पा आणि शाबू शेख अशी चारपैकी दोन संशयितांची नावे आहेत. बंगालच्या वीरभूम येथील बोगतुई गावात २१ मार्च रोजी स्थानिक तृणमूल काँग्रेसचे नेते भादू शेख (Bhadu shaikh murder) यांची हत्या झाली होती. त्यानंतर झालेल्या हिंसाचारात आठ जणांना जिवंत जाळण्यात आले. या प्रकरणी राज्य सरकारने विशेष तपास पथकाचीही (Special investigation team) स्थापना केली होती.

पुढे कोलकाता उच्च न्यायालयाने हा तपास सीबीआयकडे सोपवला. हत्येनंतर लगेचच चार आरोपी बोगतुई येथून पळून गेले होते. त्यांचा शोधार्थ सीबीआयचे पथक मुंबईत आले होते. अखेर त्यांना गुरुवारी पहाटे मुंबईतून जेरबंद करण्यात आले. अटक करण्यात आलेल्या चार आरोपींपैकी बाप्पा आणि शाबू शेख अशी दोन व्यक्तींची नावे आहेत.

या दोघांची नावे हत्येप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या एफआयआरमध्ये आहेत. चारही संशयितांना उद्या मुंबईतील न्यायालयात हजर करून पश्चिम बंगालला नेण्यासाठी ट्रान्झिट रिमांडची विनंती करणार आहोत, अशी माहिती सीबीआयच्या अधिकाऱ्याने दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT