dharavi
dharavi 
मुंबई

बापरे! धारावीसह जी- उत्तर विभागात कोरोनाचा हाहाकार ;आतापर्यंत तब्बल 90 जणांचा मृत्यू...

सकाळ वृत्तसेवा

मुंबई: मुंबईत कोरोनाग्रतांची संख्या वाढतच चालली आहे. आतापर्यंत मुंबईत तब्बल ४० हजारांच्या वर कोरोनाग्रस्तांची नोंद झाली आहे. त्यात काही वस्त्या कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. मात्र मुंबईच्या जी-उत्तर या वॉर्डात कोरोनानं अक्षरशः हाहाकार माजवला आहे. 

जी-उत्तर वॉर्डात पाॅझिटीव्ह रुग्णांची संख्या 2716 वर पोहोचली आहे. तर मृतांच्या आकडा 90 वर इतका झाला आहे. धारावीत कोरोना रूग्णवाढ सुरूच असून धारावीत गेल्या 24 तासांत 25 रुग्णांची भर पडली असून  धारावीतील कोरोना पाॅझिटीव्ह रुग्णांची संख्या 1830 वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत 71 जणांचा मृत्यू झाला आहे. 

 धारावीत आज कोणत्याही रुग्णाचा मृत्यू न झाल्याने मृतांचा आकडा 71 वर स्थिर राखण्यात प्रशासनाला यश आले आहे. मात्र रुग्णवाढ सुरूच असून रुग्णांची संख्या वाढतांना दिसत आहे. मात्र रुग्णवाढीचा दर नियंत्रणात येत असल्याचे दिसते. 

तर माहीम मध्ये 25 नवे रुग्ण सापडले असून माहीम मधील एकूण रुग्णांची  संख्या 549 तर 9 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दादर मध्ये आज 11 नवीन रुग्ण सापडले असून रुग्णांची संख्या  337 झाली आहे. तर दादर आतापर्यंत 12 दगावले आहेत. तीनही परिसर मिळून जी उत्तर विभागातील आज 61 रुग्ण सापडले असून रुग्णांचा आकडा 2716 तर मृतांचा आकडा 90 इतका आहे
g north ward has most corona patients in mumbai read full story 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : 25 कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढलं; पंतप्रधान नरेंद्र मोदी माळशिरसमधून लाईव्ह

Gharoghari Matichya Chuli: ऐश्वर्याने केलं सौमित्रला किडनॅप; 'घरोघरी मातीच्या चुली' मालिकेत नवा ट्विस्ट

Kalsubai Peak : आनंद महिंद्रांना देखील भावतोय महाराष्ट्राचा माऊंट एव्हरेस्ट, कळसूबाई शिखराला कशी भेट द्यायची ?

T20 WC 24 Team India : भारतासाठी T20 मध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या खेळाडूचा संघातून पत्ता कट?, जाणून घ्या कारण

Raghuram Rajan: भारताचा वास्तविक विकास दर 8 ते 8.5 टक्के नाही तर...; रघुराम राजन यांनी दाखवले अर्थव्यवस्थेचे दोन चेहरे

SCROLL FOR NEXT