Mumbai_Ahmadabad Highway
Mumbai_Ahmadabad Highway 
मुंबई

मुंबई-अहमदाबाद हायवेवरील धोकादायक क्रॉसिंगपासून होणार सुटका

सकाळ डिजिटल टीम

मनोर : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाचे सहापदरीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर वाहनांचा वेग वाढला खरा पण अपघातांच्या संख्येतही वाढ झाली. त्यातही महामार्ग पार करताना (क्रॉसिंग) होणारे अपघात चिंताजनक आहेत. हे अपघात रोखण्यासाठी उड्डाणपूल बांधण्याची मागणी वाहनचालक आणि ग्रामस्थांकडून केली जात होती. या मागणीनुसार महामार्गावरील मस्तान नाक्याजवळचा जव्हार फाटा, नांदगाव फाटा, चिंचपाडा आणि तलासरी तालुक्यातील अच्छाड येथे उड्डाणपूल उभारण्यात येणार आहेत. त्यासाठी चार कोटी ८० लाखांचा निधी मंजूर झाला आहे. (Get rid of dangerous crossings on Mumbai Ahmedabad highway)

मुंबई-अहमदाबाद महामार्गाच्या सहापदरीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर महामार्गावरील वाहनांचा वेग वाढला आहे. अवजड वाहने ताशी ७० ते ८० किलोमीटर प्रतितास वेगाने तर चारचाकी प्रवासी वाहने १०० ते १२० किलोमीटर प्रतितास वेगाने चालवली जात आहेत. सहा पदरीकरणानंतर महामार्गावर क्रॉसिंग असलेल्या ठिकाणी उड्डाणपुलांचे बांधकाम करण्यात आले होते. परंतु, अनेक ठिकाणी उड्डाणपूल नसल्याने धोकादायक पद्धतीने वाहने रस्ता ओलांडत होती. त्यामुळे अपघातांच्या संख्येत वाढ होत आहे. यापूर्वी झालेल्या शेकडो अपघातांमध्ये अनेकांना जीव गमवावा लागला आहे, तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. महामार्गावरील जव्हार फाटा, नांदगांव फाटा आणि मेंढवन खिंडीत अपघातांची संख्या मोठी आहे. त्यामुळे या ठिकाणी क्रॉसिंगवर उड्डाणपूल उभारण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जात होती.

ग्रामस्थांच्या मागणीबाबत खासदार राजेंद्र गावित यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे पाठपुरावा सुरू ठेवला होता. त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून, त्यानुसार जव्हार फाटा, नांदगाव फाटा, चिंचपाडा आणि तलासरी तालुक्यातील अच्छाड येथे उड्डाणपूल उभारण्यात येणार आहेत. तसेच महामार्गावरील धोकादायक वळणही काढण्यात येणार असून, या कामांसाठी ४ कोटी ८० लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. या निधीतून लवकरच कामांना सुरुवात होणार आहे.

मेंडवण खिंड सरळ रेषेत

मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील वाडा खडकोना ग्रामपंचायत हद्दीतील मेंडवण खिंडीच्या उतारावरील रस्ता धोकादायक वळणांचा असल्याने या खिंडीत अनेक अपघात झाले आहेत. अपघातात अनेक प्रवासी आणि वाहनचालकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे खिंडीतील धोकादायक वळणे काढून रस्ता सरळ रेषेत तयार करण्याची मागणी केली जात होती. या मागणीची दखल घेत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने खिंडीतील धोकादायक वळणे सरळ रेषेत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे खिंडीत होणाऱ्या अपघातांनाही लवकरच ब्रेक लागणार आहे.

महामार्गावरील क्रॉसिंगवर चार ठिकाणी उड्डाणपूल आणि धोकादायक वळणे कमी करण्यासाठी निधी मंजूर झाला आहे. लवकरच उड्डाणपुलांच्या कामाला सुरुवात होईल. त्यामुळे अपघाताच्या घटनांना आळा बसेल, अशी अपेक्षा पालघरचे खासदार राजेंद्र गावित यांनी व्यक्त केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT