मुंबई

अरुणाचलमधून आणलेल्या मुलीची पनवेलमधून सुटका

मंगेश सौंदाळकर

मुंबई - फेसबुकवरून तोंडदेखली मैत्री करून एका किशोरवयीन मुलीला वेश्‍याव्यवसायात ढकलण्याचा डाव मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेने हाणून पाडला. या मुलीला भूलथापा देऊन पळवून नेण्यात आले होते. पनवेलजवळ तिला डांबून ठेवले होते. समाजसेवा शाखेच्या पोलिसांनी कौशल्याने तपास करून तिची सुखरूप सुटका केली. तिला पळवून नेणाऱ्या तरुणाला पनवेल पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही मुलगी अरुणाचल प्रदेशातील आहे. ती बारावीत शिकते. एका तरुणाने फेसबुकवरून तिच्याशी मैत्री केली. भूलथापा देऊन तिला 18 नोव्हेंबरला पनवेलमध्ये पळवून आणले. 10 दिवस शोध घेतल्यावरही मुलगी न सापडल्याने तिच्या कुटुंबीयांनी अरुणाचल प्रदेशातील पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा नोंदवला. तिच्या नातेवाइकांनी दिल्ली पोलिसांशीही संपर्क साधला. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी मुंबई पोलिसांच्या अंमलबजावणी शाखेचे पोलिस उपायुक्त प्रवीणकुमार पाटील यांच्याशी संपर्क साधून त्यांना माहिती दिली. पाटील यांनी सहायक आयुक्त अरविंद सावंत, वरिष्ठ निरीक्षक रवींद्र गिड्डे, निरीक्षक प्रवीण कदम यांचे पथक तयार केले. या पथकाने तांत्रिक माहितीच्या आधाराने तपास सुरू केला. दरम्यान, मुलीच्या कुटुंबीयांना आरोपी तरुणाने खंडणीसाठी फोन केला. एका बॅंक खात्यात पैसे जमा करा, असे सांगितले. त्याच वेळी मुलीने आरोपीची नजर चुकवून कुटुंबीयांना फोन केला. पनवेलजवळ रहमतनगरपासून एक किलोमीटरवर रुग्णालय आणि पोलिस चौकी असून, तिथेच कुठेतरी मला कोंडून ठेवले आहे, असे तिने सांगितले. उपायुक्त प्रवीणकुमार पाटील यांनी या दुव्यावरून तपासाला गती दिली. त्या परिसरातील रुग्णालय आणि पोलिस चौकी शोधून काढण्यात आली. नेमक्‍या ठिकाणी छापा मारून मुलीची सुटका करण्यात आली. अपहरण करणाऱ्या तरुणालाही अटक केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT