मुंबई

महाराष्ट्रातील स्थिर सरकारसाठी स्थापन होणार 'सुप्रीमकमिटी'

सकाळ वृत्तसेवा

महाविकासआघाडी राज्यात स्थिर सरकार देण्यासाठी एक 'सुप्रीमकमिटी' स्थापन करणार आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी हे या कमिटीचे सदस्य असणार आहेत. किमान समान कार्यक्रमावर हे तिन्ही नेते लक्ष ठेवणार आहेत.

दरम्यान, महाविकासआघाडीचं ठरलंय, उद्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते शिवसेनेशी चर्चा करणार आहेत. राज्यात शिवसेनेसह काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार स्थापन होणार हे जवळपास निश्चित झालंय. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची आज नवी दिल्लीत शरद पवारांच्या निवासस्थानी बैठक झालीय. या बैठकीनंतर पृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीची चर्चा पूर्ण झाल्याचं सांगत दोन्ही पक्षांचं अनेक मुद्यावर एकमत झाल्याचंही स्पष्ट केलंय.

आता मुंबईला जाऊन मित्रपक्षांशी चर्चा करणार आणि त्यानंतर शिवसेनेशीही उद्या चर्चा करणार असल्याचं पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलंय. शिवसेनेशी चर्चेनंतर सर्व बाबी पत्रकारसमोर  मांडण्यात येणार असल्याची माहितीदेखील त्यांनी दिली आहे. 

मुख्यमंत्रिपदावरून शिवसेनेत वादळ ? 

महाशिवआघाडीच्या सरकारची शक्यता दृष्टीपथात आल्यानंतर आता मुख्यमंत्रिपदाबाबतची चर्चा सुरू झालीय. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री व्हावं अशी शिवसैनिकांची जरी इच्छा असली तरीही मुख्यमंत्रिपदावरून शिवसेनेत वादळ निर्माण होऊ शकतं.

WebTitle : to give stable government mahavikas aaghadi may form supreme committee

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Farmers Protest: कोकणातील शेतकरी मुंबईत आक्रमक! बडे नेते आणि आंदोलनकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड सुरु; काय आहे मागणी?

High Court : ती मशीद नाही तर देवी सरस्वतीला समर्पित मंदिर ; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण ऐतिहासिक निकाल

हार्दिक श्रेयस विसरा! रवी शास्त्रींनी टीम इंडियाच्या कॅप्टन्सीसाठी सुचवलं 'हे' नाव म्हणाला मला...

Suvendu Adhikari: बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी राजीनामा दिला; कोणती जागा सोडली? राजीनाम्यानंतर भावूक प्रतिक्रिया

Hingoli News: ई-पीकच्या नोंदींची होणार पडताळणी;पारदर्शकतेसाठी नवी नियमावली; चुका टाळण्यासाठी प्रशासनाचे पाऊल

SCROLL FOR NEXT