mumbai shaha 
मुंबई

लोकल प्रवासात चोरी झालेली सोन्याची चेन तब्बल 27 वर्षानंतर मिळाली

प्रशांत कांबळे

मुंबई : 3 डिसेंबर 1991 रोजी म्हणजेच 27 वर्षांपुर्वी लोकल प्रवास करतांना, मजुंळा शहा यांची 20 ग्रँमची सोन्याची चेन चोरीस गेली होती. त्यानंतर शहा यांनी मुंबई सेंट्रल रेल्वे पोलीसात तक्रार केली. मात्र, कालांतराने तपास आणि चौकशी, न्यायालयीन प्रकरणाचा निपटारा होऊन तब्बल 27 वर्षानंतर महिला आरोपीजवळून हस्तगत केलेली सोन्याची चेन मंजुळा यांना त्यांच्या पुण्यातील शनिवार पेठेतील राहत्या घरी लोहमार्ग पोलीसांनी सुपूर्द करण्यात आली.

मंजुळा 3 डिसेंबर 1991 रोजी नेहमीप्रमाणे महिलांच्या द्वितीय श्रेणीच्या डब्यांमधून प्रवास करत होत्या, दरम्यान फलाटावर उतरतांना महिला आरोपीने मोठ्या शिताफीने शहा यांच्या गळ्यातील सोन्याची चेनवर हात साफ केला. थोड्याच वेळा शहा यांच्या ही बाब लक्षात आली, मात्र तोपर्यंत महिला आरोपी पसार झाली होती. त्यानंतर मुंबई सेंट्रल रेल्वे पोलीसांमध्ये याची तक्रार दाखल केली. त्यानंतर काहीच दिवसांमध्ये एका फातीमा गौस नावाच्या आरोपीला पकडण्यात रेल्वे पोलीसाला यश आले. 

दरम्यान त्या महिला आरोपींपासून मंजुळा यांची सोन्याची चेन हस्तगत करण्यात आली. दरम्यानच्या काळात मेनकाबाई अरोरा चाळ कांदिवली पश्चिम मुंबई येथे राहणाऱ्या मंजुळा शहांना शोधण्यात आले. मात्र, येवढ्याच वेळात त्यांचा पत्ता बदलला होता. मात्र, त्याच परिसरात राहणाऱ्या मंजुळा यांच्या मुलीच्या घरून त्यांचा पुण्यातील मुळ पत्ता सापडला आणि अखेर, 27 वर्षांपुर्वी चोरी गेलेली सोन्याची चेन मंजुळा यांच्या हातात देण्यात आली आहे. मंजुळा आता 81 वर्षांच्या झाल्या असून, 27 वर्षानंतर त्यांना चोरी गेलेली सोन्याची चेन मिळाल्याने त्यांनी आनंद व्यक्त करत, लोहमार्ग मुंबई रेल्वे पोलीसांचे आभार मानले आहे.

न्यायालयात चालविलेल्या खटल्याअंती 2005 मध्ये चोरीस गेलेली चेन संबंधीत महिला प्रवासी यांनी परत करण्याबाबत आदेश देण्यात आले होते. न्यायालयीन आदेशाप्रमाणे महिला प्रवासी यांची हस्तगत मालमत्ता परत करण्याकरीता त्यांचे तक्रारवेळी दिलेल्या पत्यावर त्यांचा शोध घेतला. मात्र, पत्ता बदलण्यात आल्यानंतर काही दिवसानंतर शहा यांची मुलगी रिमा शहा यांच्याकडून मंजुळा यांचा पत्ता सापडला. त्यानंतर सोन्याची चेन त्यांना परत करण्यात आली आहे.

रेल्वे कोर्टाचे अॅड.हसमुख बोरा म्हणाले, कोणताही वस्तु चोरी झाल्यानंतर तक्रार दाखल केली जाते. त्यानंतर मिळालेल्या मालाची ओळख करण्यासाठी फिर्यादीला बोलवायला पाहिजे. मात्र, अनेक वेळा अशा प्रकरणांमध्ये ओळख करण्यासाठी बोलविल्या जात नाही आणि अनेक वर्षानंतर अचानक मुद्देमाल परत करण्याचे सांगितल्या जात आहे. मात्र रेल्वे पोलीसांचा हा देखावा आहे. यामध्ये जास्तीत जास्त प्रकरण अद्याप ही प्रलंबीत असून, आता सर्वात जास्त 90 टक्के मोबाईल चोरीचे प्रकरणाच्या तक्रारी नोंदविल्या जात आहे. 

संपादन - सुस्मिता वडतिले 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abu Azmi Vs MNS : Video - ‘’रिक्षावाले, फेरीवाल्यांना काय मारता, मारायचंच आहे ना, तर..’’ ; अबू आझमींनी ‘मनसे’ला ललकारलं!

IND vs ENG 2nd Test: शुभमनच्या २६९ धावा अन् नंतर आकाश दीपचा भेदक मारा! इंग्लंडच्या संघाची घरच्या मैदानावर झालीय वाईट अवस्था

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

SCROLL FOR NEXT