Govind Pansare Assign murder investigation to ATS Govind Pansare Assign murder investigation to ATS
मुंबई

गोविंद पानसरे : हत्येचा तपास ATS कडे सोपवा; कुटुंबीयांकडून विनंती अर्ज

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : विचारवंत, भाकपचे ज्येष्ठ नेते व कॉम्रेड गोविंद पानसरे (Govind Pansare) यांच्या हत्या प्रकरणाचा तपास दहशतवादविरोधी पथकाकडे (ATS) सोपवावा, असा विनंती अर्ज मुंबई उच्च न्यायालयात करण्यात आला आहे. पानसरे कुटुंबीयांचे वकील अभय नेवगी यांनी हा विनंती अर्ज दाखल केला आहे. न्यायालयाने याबाबत राज्य सरकारचे म्हणणे काय आहे ते मांडण्याचे निर्देश दिले आहेत.

पानसरे यांच्यावर १६ फेब्रुवारी २०१५ रोजी गोळ्या झाडल्या होत्या. २० फेब्रुवारीला उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता. मॉर्निंग वॉकला गेले असताना त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. या घटनेला सात वर्षे पूर्ण झाली आहेत.

न्यायमूर्ती रेवती ढेरे आणि न्यायमूर्ती व्हीजी बिष्ट यांच्या पीठापुढे हा अर्ज करण्यात आला आहे. नरेंद्र दाभोलकर, एम. एम.कलबुर्गी, गौरी लंकेश आणि पानसरे यांच्या हत्येमागे मोठा कट आहे. त्याचा तपास योग्यप्रकारे होणे गरजेचे आहे, असे गोविंद पानसरे (Govind Pansare) यांच्या वकिलांनी अर्जात म्हटले आहे.

नरेंद्र दाभोलकर प्रकरणाचा तपास सुरू असल्याने दुसऱ्या तपास यंत्रणेकडे देणे अशक्य आहे. मात्र, गोविंद पानसरे यांच्या हत्येचा तपास एटीएसकडे (ATS) देणे शक्य आहे, असेही विनंती अर्जात पानसरे यांच्‍या वकिलांनी म्हटले आहे. दुसरीकडे पानसरे हत्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या तपास अधिकाऱ्यांनी बदलीसाठी न्यायालयाची परवानगी मागितली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: शुभमन गिलने जिंकलं 'दिल'! ऐतिहासिक कामगिरी अन् इंग्लंडला न पेलवणारे लक्ष्य; भारताच्या १०००+ धावा

Central Railway: मध्य रेल्वेची ज्येष्ठांसाठी मोठी घोषणा

Rabri Devi Statement : तेजप्रताप यादव प्रकरणावर पहिल्यांदाच राबडी देवींनी सोडलं मौन अन् जाहीर कार्यक्रमात, म्हणाल्या...

लग्न न करताच ४० व्या वर्षी जुळ्या मुलांची आई होणार अभिनेत्री; म्हणाली, 'आपल्याकडे एकटी स्त्री...

Aurangabad Murder Case : काकाच्या प्रेमात पडलेल्या महिलेने ४० लाख अन् प्लॉट हडपण्यासाठी काढला पतीचा काटा!

SCROLL FOR NEXT