मुंबई

कोण म्हणतं दिवाळी अंक वाचत नाही; ऋतूरंग तीन वेळा छापावा लागला 

समीर सुर्वे

मुंबई : दिवाळी अंक आता पुर्वी सारखा वाचला जात नाही.कोविड काळात दिवाळी अंक छापणेही शक्य नाही.या फक्त चर्चाच राहील्या आहेत.28 वर्षांपासून प्रसिध्द होणारा ऋतूरंग दिवाळी अंक यंदा तीन वेळा छापावा लागला.

दिवाळी आणि दिवाळी अंक हे गेल्या अनेक दशकांचे ऋणानुबंध आहे.मात्र,गेल्या काही वर्षांपासून दिवाळी अंकाचा खप कमी होऊ लागलाय अशी तक्रार केली जात होती.पण,ऋतूरंग दिवाळी अंकाने ही तक्रार खोटी ठरवली आहे.यंदा ऋतूरंगचा अंक तीन वेळा छापावा लागला असे संपादक अरुण शेवटे यांनी सांगितले.दिवाळी अंक वाचणारा वाचक हा वेगळाच आहे.हा दिवाळी अंक फक्त दिवाळीतच नाही डिसेंबर जानेवारी पर्यंत वाचला जातो.नियमीत प्रसिध्द होणारी मासिक फारशी नसल्याने आता दिवाळी अंकाचा वाचक वाढत आहे.अशा शब्दात वाढलेल्या खपाचे गुपित अरुण शेवटे सांगतात.कवी गुलजार,अभिनेता अमिताभ बच्चन, माजी मुख्यमंत्री सुशिल कुमार शिंदे,शिवसेना नेते संजय राऊत, भाजपचे खासदार विनय सहस्त्रबुध्दे, डॉ.अभय बंग, जेष्ट पत्रकार दिनकार रायकर, सकाळ मुंबईचे निवासी संपादक रवी आमले,मधुकर भावे,लेखक कवी रामदास फुटाणे, या व अशा अनेक मात्तबर व्यक्तींचेे लेख या अंकात वाचायला मिळतात.

लेखकांनी मानधन परत केले 

य़ा अंकासाठी लेख लिहीलेल्या काही लेखकांनी त्यांचे मानधनही घेतले नाही. रामदास फुटाणे, संजय राऊत,साहित्य संस्कृती मंडळाच्या सचिव मिनाक्षी पाटील, नामदेव अंजना, रवी आमले,आनंद आवधानी यांनी मानधन स्विकारले नाही.असेही अरुण शेवटे यांनी सांगितले.

--------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Crisis: ऊर्जा संकटात केंद्र सरकारचा मोठा निर्णय! LPG पुरवठ्यात 20% वाढ; वाटप 50% पर्यंत वाढवले, राज्यांना दिलासा

'स्वामी समर्थ'मध्ये सुरू होणार 'महानिर्वाणाचा अध्याय; हे अभिनेते साकारणार प्रौढ स्वामींची भूमिका

Latest Marathi News Live Update : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी कोलकाता येथे पश्चिम बंगालचे राज्यपाल आर. एन. रवी यांची भेट घेतली

Urali Kanchan News : एमआयटी एडीटी–रायन सहकार्याने विद्यार्थ्यांसाठी नवोन्मेष आणि तंत्रज्ञान शिक्षणाची नवी दिशा

Akola News : अकोल्यात गॅस संकट तीव्र! १० दिवसांपासून सिलिंडर नाही; नागरिकांचा संताप, आंदोलनाचा इशारा

SCROLL FOR NEXT