मुंबई

सरकारच्या नोटाबंदीमुळे सायबर गुन्ह्यांत वाढ

ऊर्मिला देठे

बॅंकांकडे वाढत्या तक्रारी; एटीएम कार्डधारकांची फसवणूक
मुंबई - शहरातील नागरिकांना सायबर गुन्हेगारांकडून ऑनलाइन गंडा घालण्याचे प्रकार वाढू लागले आहेत. फोन कॉलवरून होणाऱ्या या ऑनलाइन गुन्ह्यांबद्दलच्या तक्रारींत वाढ झाली आहे. ऑक्‍टोबरमध्ये 212 आणि नोव्हेंबरमध्ये 264 तक्रारी बॅंकांकडे आल्या आहेत. आरोपींविरोधात गुन्हे दाखल झाले असले, तरी विशेष बाब म्हणजे यांतील एकाही आरोपीपर्यंत पोचण्यात पोलिसांना अद्याप यश आलेले नाही.

सायबर गुन्हेगार एटीएम कार्डधारकांना लक्ष्य करतात. कार्डधारकाचा मोबाईल क्रमांक मिळवून त्याला फोन करतात. बॅंकेच्या मुख्य शाखेतून बोलत असल्याची थाप मारून एटीएम कार्ड ब्लॉक होणार असल्याचे किंवा ते अपग्रेड करण्यात येणार असल्याचे ग्राहकाला सांगतात. कार्डावरील क्रमांक विचारतात. गोंधळलेले एटीएम कार्डधारक 16 अंकी क्रमांक सांगून मोकळे होतात. कार्डधारकांना विचार करण्याचा वेळ न देता "ओटीपी' विचारण्यात येतो. काही वेळातच ग्राहकाच्या खात्यातून पैसे वळते केले जातात.

बनावट सिमकार्डांचा वापर
ही फसवणूक करणाऱ्यांत परप्रांतीय गुन्हेगार मोठ्या संख्येने असतात. अशा गुन्ह्यांत पोलिसांनी मोबाईल किंवा सिमकार्डच्या आधारावर तपास करण्याचा प्रयत्न केला तर उत्तर भारत किंवा दक्षिणेतील राज्यांतून हे कॉल शोधून काढेपर्यंत आरोपी सिमकार्ड बदलतात. त्यामुळे तपास अधिक अवघड होतो, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

बॅंक अधिकारी कधीही कार्डावरील माहिती किंवा पासवर्ड, एटीएम पिन मागत नाहीत. त्यामुळे अशा फोनकॉलना बळी पडू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

कोणत्याही अनोळखी मोबाइल क्रमांकावरून एटीएमची माहिती विचारणारा कॉल आल्यास माहिती देऊ नये. आपल्या कार्डवरील क्रमांक त्याला सांगू नये. एटीएममधील रक्कम काढताना अनोळखी व्यक्तींची मदत घेऊ नये.
- सचिन पाटील, पोलिस उपायुक्त, सायबर सेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhattisgarh Accident News: कार रस्त्यावर उभी असताना पिकअपची धडक अन्.... भीषण अपघातात ८ ठार, मृतांमध्ये 3 लहान मुलांचा समावेश

मोठी बातमी! बारावीचा 25 मे तर दहावीचा निकाल 5 जूनपूर्वी; विद्यार्थ्यांची जुलैमध्ये पुरवणी परीक्षा; बोर्डाच्या परीक्षेत भविष्यात असा होईल बदल

पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज सभा! विमानतळ ते होम मैदान अन्‌ शहरातील ‘हे' दोन मार्ग राहणार बंद; सभेसाठी कसे यायचे, वाहने कोठे लावायची? वाचा सविस्तर

Sakal Podcast : लातुरात कोण बाजी मारणार? ते चित्रपट निवडीबाबत मृणाल ठाकूरचा मोठा खुलासा

Nashik Fire Accident : ‘इलेक्ट्रिकल ऑडिट’कडे दूर्लक्षामुळे आगीला मिळते निमंत्रण; भीषण आगीत कोट्यवधींची मालमत्तेची राख

SCROLL FOR NEXT