मुंबई

मुंबईत पावसाचा जोर ओसरला; ठाणे, पालघर रायगडचीही जाणून घ्या स्थिती

समीर सुर्वे

मुंबई : मुंबईत पावसाचा जोर ओसरला असून गुरुवारपर्यंत मुंबईसह ठाणे, पालघर आणि सिंधुदूर्ग जिल्ह्यात अशीच परिस्थिती राहाणार आहे. तर, रायगड रत्नागिरी मध्ये उद्या मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे. गौरी गणपती विसर्जनला रत्नागिरी रायगडमध्ये पाऊस पुन्हा जोर धरण्याची शक्‍यता आहे.

मुंबईत आज दहिसर येथे 67 मि.मी त्या खालोखाल महालक्ष्मी येथे 33.5 मि.मी पावसाची नोंद झाली. इतर ठिकाणी अधून मधून पावसाची सरी कोसळत होत्या. पुढील गुरुवार पर्यंत मुंबईत अशीच परिस्थिती राहाणार आहे. त्यामुळे कमाल तापमानात वाढ होऊ 1 ते 2 अंशाची वाढ होऊन 31 अंशा पर्यंत पोहचेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.मुंबईसह ठाणे, पालघर आणि सिंधुदूर्ग जिल्ह्यातही पुढील गुरुवार पर्यंत हलक्‍या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस राहील.

तर,रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात उद्या जोरदार पावसाची शक्‍यता असून नंतर दोन दिवस हलक्‍या सरी कोसळतील.असा अंदाज आहे.गौरी गणपतीचे विसर्जन गुरुवारी होणार आहे.या दिवशी रत्नागिरी रायगड परीसरात पावसाचा जोर वाढण्याची शक्‍यता आहे.

-------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Disha Patani house firing अभिनेत्री दिशा पटानीच्या घरावर गोळीबार; ‘या’ गँगस्टरने घेतली हल्ल्याची जबाबदारी!

Phulambri Accident : कार-दुचाकीचा अपघात मुलाच्या डोळ्यासमोर बापाने सोडला जीव..! मुलगा थोडक्यात बचावला

Latest Marathi News Updates Live : एसटीच्या ७५ बसस्थानकावर मोफत वाचनालय

PAK vs OMN : पाकिस्तानच्या दुबळ्या ओमानविरुद्ध रडले, फलंदाजांनी माना टाकल्या; भारताविरुद्ध निघणार यांची हवा...

Chhagan Bhujbal: ''मराठ्यांना EWS अन् SEBC आरक्षण नकोय का? उत्तर द्या'' छगन भुजबळांचा समाजाला प्रश्न

SCROLL FOR NEXT