मुंबई

'मुख्यमंत्र्यांचा भाजपा द्वेष किती मोठा'? अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली न वाहिल्याने मुख्यमंत्र्यांवर भाजपचे टीकास्त्र

migrator

मुंबई - राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले. अन् तेव्हापासूनच भारतीय जनता पक्षाच्या निशाण्यावर उद्धव ठाकरे हे आहेत. काल भाजपचे दिवंगत नेते, भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती होती. मुख्यमंत्र्यांनी त्यांना श्रद्धांजली न वाहिल्याने राज्यातील भाजपनेत्यांनी त्यांच्यावर टीकेचा वर्षाव केला आहे. 

भारतीय जनता पक्षाचे दिवंगत नेते, माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांची काल  ( 25 डिसेंबर ) रोजी जयंती होती. विरोधी पक्षातील अनेक महत्वाच्या नेत्यांनी अटल बिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहिली. परंतु शिवसेनापक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी वाजपेयी यांना श्रद्धांजली न वाहिल्याने राज्यातील भाजप नेते ठाकरे यांच्यावर टीका करीत आहेत. भाजपनेते आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विट केले आणि म्हटले की, ' काल श्रध्येय अटलजींच्या जयंती दिनी मुख्यमंत्र्यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली नाही. मुख्यमंत्र्यांचा भाजपा द्वेष किती मोठा आहे याची पुन्हा एकदा प्रचिती आली. चेहऱ्यावर सतत उसनं हसू आणून हा विद्वेष लपवता येईल का? '

भाजप आमदार आशिष शेलार यांनी देखील मुख्यमंत्र्यांवर शरसंधान साधले आहे. त्यांनीदेखील ट्विट करीत म्हटले की,  ' भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीचे विस्मरण काल मा. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना झाले. सत्तेसाठी अशा अनेक गोष्टी सोईस्करपणे विस्मृतीत टाकल्या जात आहेत. असो. अटलजींच्या शब्दात सांगायचे तर छोटे मन से कोई बड़ा नहीं होता, टूटे मन से कोई खड़ा नहीं होता. ' 

How big is the BJPs hatred of the Chief Minister? BJPs criticism of Chief Minister for not paying tribute to Atal Bihari Vajpayee

----------------------------------------------------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT