मुंबई

"उद्धव ठाकरे यांच्यामुळे मला महाराष्ट्रात सुरक्षित वाटतं" - अनुराग कश्यप

सुमित बागुल

मुंबई : सुशांत सिंह राजपूत मृत्यूनंतर महाराष्ट्रात मोठं राजकीय नाट्य पाहायला मिळालं. कंगनाने या सर्व प्रकारात उडी घेत कायम वादग्रस्त वक्तव्य केल्याने हे प्रकरण जास्त चर्चेत राहिलं. या सर्व वादादरम्यान कंगनाने मुंबईची तुलना थेट पाकव्याप्त काश्मीर अशीही केली. यानंतर हा वाद अधिक चिघळला, वाढला. कंगनाच्या या मतानंतर बॉलिवूड आणि समाजाच्या विविध स्तरांवरून प्रतिक्रिया आल्यात. कंगनाचं मत चुकीचं असल्याचं सर्वांचं म्हणणं ठरलं.

यामध्ये आता अनुराग कश्यप याने मुंबई आणि महाराष्ट्राबाबत आपलं मत मांडलं आहे. अनुराग कश्यप यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामुळे मला महाराष्ट्रात सुरक्षित वाटतं असं म्हटलंय. एका मुलाखतीत दिग्दर्शक अनुराग कश्यप याने आपलं मत मांडलं आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भूमिकांबद्दल माझी मतं वेगळी असू शकतात. मात्र उद्धव ठाकरे यांच्यामुळे मला महाराष्ट्रात सुरक्षित वाटतं. गेल्या काही काळात ज्या गोष्टी महाराष्ट्रात घडतायत त्यामुळे एक पक्ष म्हणून शिवसेनेबाबत माझं मत, शिवसेनेबाबतची माझ्या मनातील प्रतिमा पूर्णपणे बदलली आहे. हे सर्व उद्धव ठाकरेंमुळे घडलं. महाराष्ट्रात असताना मी माझी मतं खुलेपणाने मांडू शकतो, असंही अनुराग कश्यप म्हणालाय.      

सुशांत सिंह राजापूरच्या मृत्यूनंतर सर्वच स्तरातून प्रतिक्रिया उमटल्या. आता सुशांत प्रकरणी CBI तपास करतेय. यामध्ये रोज नवनवे मुद्दे समोर येतायत. सुशांतला न्याय मिळावा म्हणून कंगनाने सुशांतीची बाजू मांडण्यासाठी अनेक मुद्यांवर टिप्पणी केलीये. मात्र यामध्ये कंगना वादाच्या भोवऱ्यात सापडलीय. नुकतंच कंगना आणि अनुरागमध्ये शाब्दिक चकमक झाल्याचंही आपल्याला ठाऊक आहे. 

i feel safe in maharashtra because of chief minister uddhav thackeray

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naxalites Support Rahul Gandhi : राहुल गांधींच्या 'वोटचोरी'च्या आरोपांना नक्षलवाद्यांचाही पाठिंबा...११ पानी पत्रक जारी करत दिलं समर्थन!

Maharashtra Govt Jobs : भूमिअभिलेख विभागात ९०५ पदांची भरती, राज्य सरकारची मान्यता

Sunday Morning Breakfast : रविवारी ब्रेकफास्टला बनवा कुरकुरीत बीटचे कटलेट, सोपी आहे रेसिपी

क्रिकेट द्वंद्व ऐरणीवर

India vs Pakistan Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान आशिया कप लढत! रेकॉर्ड्स, स्टॅट्स आणि संभाव्य विजेता कोण?

SCROLL FOR NEXT