ICSE 10th written examination from today CBSE exams from Tuesday mumbai sakal
मुंबई

आजपासून आयसीएसईची दहावीची लेखी परीक्षा

मंगळवारपासून सीबीएसईची परीक्षा

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : आयसीएसई केंद्रीय मंडळाच्या दहावीच्या दुसऱ्या सत्राच्या परीक्षेची सुरुवात सोमवार (ता. २५)पासून देशभरात होत आहे. याच मंडळाच्या बारावीची परीक्षा मंगळवारी (ता. २६) होत आहे. त्याचबरोबर केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या म्हणजेच सीबीएसईच्या दहावी-बारावीची परीक्षाही २६ एप्रिलपासून होत आहेत.

दोन्ही मंडळांच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने होत आहेत. त्यासाठी दोन्ही मंडळांकडून विद्यार्थ्यांना काही दिवस अगोदरच हॉल तिकीट उपलब्ध करून देण्यात आले आहे. परीक्षा केंद्राची माहितीही प्रत्येक शाळा आणि परीक्षा केंद्रावर व संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. आयसीएसई परीक्षेला विद्यार्थ्यांना कोरोनाच्या लशीपासून सवलत देण्यात आली आहे. त्यासाठी मंडळाकडून देान दिवसांपूर्वी एक परिपत्रक जारी करून त्यासाठीची माहिती देण्यात आली होती.

दुसरीकडे सीबीएसईनेही आपल्या दहावी-बारावीच्या दुसऱ्या सत्राच्या परीक्षेत विद्यार्थ्यांच्या लिहिण्याचा सराव कमी झाल्याचे लक्षात घेऊन परीक्षा वस्तुनिष्ठ आणि बहुपर्यायी पद्धतीने घेण्याचे नियोजन केले आहे. विद्यार्थ्यांना ४० गुणांची प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी दोन तासांचा वेळ दिला गेला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Free Trade Deal: मोठी आर्थिक घडामोड! व्हिस्की, लक्झरी कारसह अनेक वस्तू होणार; ग्राहकांना दिलासा मिळणार, पण कधीपासून?

IND vs ENG Women Test : भारताविरुद्धच्या ऐतिहासिक कसोटीसाठी इंग्लंडचा संघ जाहीर; ५ नव्या चेहऱ्यांना संधी

Vegetable Rate Hike : पावसाचे आगमन लांबले; भाजीपाला महागला! आवक ४० टक्क्यांनी घटली; मेथी, भेंडी, पालक, वांगीही तेजीत

Bullet Train: भारतच पुढची बुलेट ट्रेन उभारणार! मुंबईहून पुण्यात अवघ्या ४८ मिनिटांत पोहोचणार; कामाला सुरुवात कधी होणार?

'तो फोनवर घाणेरडं बोलत होता' अमृता खानविलकरने सांगितला धक्कादायक अनुभव, म्हणाली...'निनावी नंबरवरून कॉल आला अन्...'

SCROLL FOR NEXT