ICSE 10th written examination from today CBSE exams from Tuesday mumbai sakal
मुंबई

आजपासून आयसीएसईची दहावीची लेखी परीक्षा

मंगळवारपासून सीबीएसईची परीक्षा

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : आयसीएसई केंद्रीय मंडळाच्या दहावीच्या दुसऱ्या सत्राच्या परीक्षेची सुरुवात सोमवार (ता. २५)पासून देशभरात होत आहे. याच मंडळाच्या बारावीची परीक्षा मंगळवारी (ता. २६) होत आहे. त्याचबरोबर केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या म्हणजेच सीबीएसईच्या दहावी-बारावीची परीक्षाही २६ एप्रिलपासून होत आहेत.

दोन्ही मंडळांच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने होत आहेत. त्यासाठी दोन्ही मंडळांकडून विद्यार्थ्यांना काही दिवस अगोदरच हॉल तिकीट उपलब्ध करून देण्यात आले आहे. परीक्षा केंद्राची माहितीही प्रत्येक शाळा आणि परीक्षा केंद्रावर व संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. आयसीएसई परीक्षेला विद्यार्थ्यांना कोरोनाच्या लशीपासून सवलत देण्यात आली आहे. त्यासाठी मंडळाकडून देान दिवसांपूर्वी एक परिपत्रक जारी करून त्यासाठीची माहिती देण्यात आली होती.

दुसरीकडे सीबीएसईनेही आपल्या दहावी-बारावीच्या दुसऱ्या सत्राच्या परीक्षेत विद्यार्थ्यांच्या लिहिण्याचा सराव कमी झाल्याचे लक्षात घेऊन परीक्षा वस्तुनिष्ठ आणि बहुपर्यायी पद्धतीने घेण्याचे नियोजन केले आहे. विद्यार्थ्यांना ४० गुणांची प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी दोन तासांचा वेळ दिला गेला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TV Advertising Rules: टीव्हीवर आता जास्त जाहिराती दिसणार? केंद्र सरकारने २० वर्षांचा नियम हटवला; दर्शकांवर काय परिणाम होणार?

CM Vijay Trisha Viral News : चेन्नईत काय घडलं? थलपती विजय यांना पाहताच अभिनेत्री त्रिशानं मारला कडक सॅल्यूट; तिच्या पिवळ्या साडीतील लूकनंही वेधलं लक्ष

तब्बल १० वर्ष सोनाली कुलकर्णीसोबत बोलत नव्हता सिद्धार्थ जाधव; कारण सांगत अभिनेत्री म्हणाली, 'जेव्हा श्रीदेवींचं निधन झालं...'

Marathi News Live Updates : सर्वांमध्ये एकता, देशाबद्दल प्रेम आणि सद्भावना असायला हवी - रितू तावडे

स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमाला निघालेल्या मुली, ट्रॅव्हल्सने दुचाकीला धडक दिल्यानं ३ मैत्रिणींचा मृत्यू

SCROLL FOR NEXT