वालिवली पुलाजवळील बंगल्यांमध्ये शिरलेले पुराचे पाणी 
मुंबई

बदलापुरात बांधकामांचा महा‘पूर’  

गिरीश त्रिवेदी

बदलापूर : ‘येरे माझ्या मागल्या...’ या म्हणीप्रमाणे बदलापूर शहरात उल्हास नदीकाठी बांधकामांचाच महापूर आल्याचे चित्र पाहावयास मिळाले. २६ जुलै २००५ ला आलेल्या महाभयंकर पुरामुळे जवळपास सर्वच यंत्रणांच्या मर्यादा स्पष्ट झाल्या होत्या. काय करायला हवे होते आणि काय टाळायला हवे, हे सर्व त्यानिमित्ताने स्पष्ट झाले होते; मात्र या सर्व गोष्टींना काही दिवस महत्त्व देऊन नंतर सर्वच यंत्रणा जुन्या पद्धतीने कारभार करू लागल्या. याचा व्हायचा तोच परिणाम झाला. पालिका प्रशासन म्हणते उल्हास नदीची पूर नियंत्रण रेषाच अस्तित्वात नाही, तर पाटबंधारे विभाग म्हणते उल्हास आणि भातसा नदीच्या पूरनियंत्रण रेषा या पूर्वीच स्पष्ट केल्या आहेत; मात्र दोन्ही प्रशासनाच्या असमन्वयाचा फटका नागरिकांना बसत आहे. 

२६ आणि २७ जुलै २०१९ ला झालेल्या मुसळधार पावसामुळे उल्हास नदीच्या पाण्याची पातळी प्रचंड वाढली. त्यामुळे नदीपात्रात तसेच नदीच्या किनाऱ्यावर नव्याने विकसित झालेल्या गृहप्रकल्पांना याचा फार मोठा फटका बसला. २००५ च्या पुरानंतर बदलापूरच्या विकासात पुराचा विचार केला जाईल, अशी अपेक्षा होती; मात्र २००५ च्या पुरातून संबंधित यंत्रणा काही एक शिकले नाही, हे उघड झाले. विकासाच्या नावाखाली बेदरकारपणे पूररेषेत केलेले बांधकाम सर्वाधिक कारणीभूत ठरल्याचे समोर आले आहे. 

उल्हास नद्यांना येऊन मिळणाऱ्या बारवीसारख्या उपनद्यांची पूररेषा पाटबंधारे खात्याने निश्‍चित केली आहे. ठाणे जिल्ह्यात उल्हास आणि भातसा या दोन नद्यांची पूररेषा निश्‍चित केली आहे. काळू आणि शाई नदीच्या पूर नियंत्रण रेषेचे काम प्रगतिपथावर आहे. 
- योगेश पाटील, कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग

पूर रेषेबाबतची सर्व जबाबदारी ही लघू पाटबंधारे विभागाची आहे; मात्र कर्जतपासून मिरा-भाईंदरपर्यंत पूररेषा अजूनही निश्‍चित झालेली नाही. बदलापुरात यापुढे उल्हास नदीच्या परिसरातील भागात तळमजल्यावर सदनिकांना मंजुरी न देण्याचा ठराव मंजूर करून सरकारकडे पाठविला जाईल.
- प्रकाश बोरसे,  मुख्याधिकारी.

कोणी चुका केल्या या वादात न पडता भविष्यात अशा प्रकारे कोणाचेही नुकसान होऊ नये. जीवित वा वित्तहानी होऊ नये, यासाठी सर्व संबंधित यंत्रणांना एकत्र घेऊन नियोजन करावे लागणार आहे. महापुरात वित्तहानी मोठ्या प्रमाणात झालेली आहे. त्याचे पंचनामे सुरू असून नुकसानभरपाई देण्यात येईल.
- किसन कथोरे, आमदार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: मोठी बातमी! लाडक्या बहिणींना मिळणार २१०० रुपये, एकनाथ शिंदेंनी केलं जाहीर; पैसे कधी हातात पडणार?

Nat Sciver Brunt: तीन हंगामांची प्रतीक्षा संपली! WPL मध्ये पहिलं शतक ठोकलं; नॅट सायव्हर ब्रंटनं रचला इतिहास

Bigg Boss 6: बिग बॉसच्या घरात 'मिस्टर इंडिया'ची झाली वाईल्ड कार्ड एन्ट्री! आता कोण जाणार घराबाहेर?

T20 World Cup 2026: टी-२० विश्वचषक २०२६ साठी वेस्ट इंडिजचा १५ सदस्यीय संघ जाहीर! अष्टपैलू खेळाडूंवर भर, पाहा संपूर्ण टीम

Budget 2026: अर्थसंकल्पाची सूत्रे 'या' महिला अधिकाऱ्याच्या हाती! निर्मला सीतारमण यांच्या सोबत बजेट तयार करणारी टीम कोण? वाचा इनसाइड स्टोरी

SCROLL FOR NEXT