ulhasnagar
ulhasnagar 
मुंबई

उल्हासनगरातील कृत्रिम तलावात 16 हजार 661 बाप्पांचे विसर्जन

दिनेश गोगी

उल्हासनगर : पालिकेने तयार केलेल्या पाच कृत्रिम तलावात उल्हासनगरातील गणपती बाप्पांचे विसर्जन करण्यात आले आहे. तलावातून 45 टन निर्माल्य जमा झाले असून त्यातून खतनिर्मिती करण्यात येणार असल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी विनोद केणे यांनी दिली.

2001 मध्ये पालिकेने शिवसेनेचे माजी नगरसेवक सुरेश जाधव यांच्या पुढाकाराने उल्हासनगर रेल्वे स्थानकाजवळ पहिला प्रशस्त कृत्रिम तलाव तयार केलेला आहे. या एकमेव तलावात बाप्पाच्या लहान तसेच तीन चार फुटाच्या मूर्तीचे विसर्जन करण्यात येत आहे.हा तलाव कॅम्प नंबर 3-4 मधील गणेशभक्तांची पहिली पसंती आहे. याव्यतिरिक्त शिवमंदिर, उल्हास नदी, वालधुनी नदीवरील हिराघाट येथे लहान मोठ्या मूर्तींचे विसर्जन केले जात होते. मात्र यंदा नदी पात्रात विसर्जनास मनाई करण्यात आल्याने आयुक्त गणेश पाटील यांच्या निर्देशान्वये पालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने आयडीआय, सेंच्युरी,बोटक्लब, कैलास कॉलनी येथे कृत्रिम तलावाची निर्मिती केली.तलाव तयार करण्यापासून ते विसर्जनापर्यंत पालिकेचे शहर अभियंता महेश सितलानी, सहाय्यक आयुक्त गणेश शिंपी, कनिष्ठ अभियंता जितू चोईथानी, संदीप जाधव, अश्विनी आहुजा, वाहन व्यवस्थापक यशवंत सगळे, मुख्य स्वच्छता निरीक्षक एकनाथ पवार, मुख्य सुरक्षा अधिकारी बाळू नेटके, अग्निशमन अधिकारी भास्कर मिरपगार यांनी जबाबदारी हाताळली.

पालिका विद्युत विभागाचे अभियंता हनुमंत खरात,महेंद्र दिंडे यांनी कृत्रिम तलाव भागात लाईटची व्यवस्था चोख बजावली. पोलीस उपायुक्त प्रमोद शेवाळे, सहाय्यक पोलीस आयुक्त मारुती जगताप, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय डोळस, दत्तात्रय पालवे, राजेंद्र कदम, घनश्याम पलंगे, वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याणजी घेटे आदींनी चोख बंदोबस्त ठेवल्याने विसर्जन प्रसंगी कोणतीही अप्रिय घटना घडली नाही.

दरम्यान कृत्रिम तलावातून 45 टन निर्माल्य जमा झाले आहे.स्वच्छ भारत अभियान अंतर्गत बोट क्लब येथे या निर्माल्यातून खत निर्मिती करण्यात येणार असून हे खत उल्हासनगरातील उद्यान-बगीचे, कॉलेज-शाळाच्या आवारातील शोभिवंत झाडांना टाकण्यात येणार असल्याचे जनसंपर्क अधिकारी विनोद केणे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT