मुंबई

सरकारच्या विरोधात हक्कभंग मांडणार - विखे

सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई - आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना पाच लाख रुपयांची मदत देण्याचे आश्वासन न पाळल्याबद्दल राज्य सरकारच्या विरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव मांडणार असल्याची माहिती विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी शनिवारी (ता. 5) शिर्डीत दिली.

विखे-पाटील सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाची सुरवात आज विखे-पाटील यांच्या उपस्थितीत झाली. त्या वेळी पत्रकारांशी बोलताना विखे-पाटील यांनी सरकारवर टीका केली. हे सरकार घोषणांचा पाऊस पाडणारे आणि स्वप्नांची मालिका दाखवणारे आहे. सभागृहात दिलेली आश्वासने न पाळल्याने सरकार शेतकऱ्यांच्या बाबतीत किती असंवेदनशील आहे, ते दिसते, असे विखे-पाटील म्हणाले.

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाच्या वारसांना सरकारकडून मदत मिळाली नसल्याचे अलीकडेच उघड झाले आहे. या माहितीचा हवाला देत विखे-पाटील म्हणाले, अर्थसंकल्पी अधिवेशनात 13 मार्च 2015 रोजी तत्कालीन महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत सूतोवाच केले होते. एक लाख रुपयांच्या मदतीत पाच लाख रुपयांपर्यंत वाढ करून त्याची लगेच अंमलबजावणी करण्याचे आश्‍वासन खडसे यांनी दिले होते. मात्र सरकारचे हे आश्वासन पोकळ ठरले. या पार्श्‍वभूमीवर सरकारच्या विरोधात हक्कभंग प्रस्ताव मांडण्यात येणार असल्याचे विखे पाटील यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pension Department: पेन्शनधारकांना सरकारची मोठी भेट! नवीन ऑनलाइन पोर्टल केले लाँच; मिळणार 'या' सुविधा

Latest Marathi News Live Update: सलमान खान गोळीबार प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल; सीबीआय तपासाची केली मागणी

Indian Navy : अरबी समुद्रात पुन्हा भारतीय नौदलाची हवा, 20 पाकिस्तानींसाठी ठरले देवदूत

Bhushan Pradhan: 'या' अभिनेत्रीच्या प्रेमात पडलाय भूषण प्रधान? व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, "लवकर लग्न करा!"

Virat Kohli : 'खूप फसवणूक झाली मात्र आता...' विराट कसा झाला 634 कोटी रूपयाचा मालक?

SCROLL FOR NEXT