मुंबई

'शेतकऱ्यांना भडकावणाऱ्या आझमींची चौकशी करा'; भाजप नेत्याचे केंद्रीय गृहमंत्र्यांना पत्र

कृष्ण जोशी

मुंबई - शेतकरी आंदोलनाच्या आडून दिल्लीत हिंसक आंदोलन करणाऱ्यांना चिथावणी देणारे समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी तसेच त्यांच्या सूत्रधारांची चौकशी करावी, अशी मागणी करणारे पत्र आमदार अतुल भातखळकर यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना लिहिले आहे. 

प्रजासत्ताक दिनी मंगळवारी दिल्लीत शेतकऱ्यांनी केलेल्या हिंसक आंदोलनात किमान 90 पोलिस जखमी झाले आहेत; तर त्याआधी मुंबईतील शेतकरी आंदोलनातील जाहीर सभेत आझमी यांनी शेतकऱ्यांना भडकवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही भातखळकर यांनी केला. 

राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी काही विरोधी पक्ष शेतकऱ्यांची माथी भडकवण्याचे काम करीत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून सोमवारी मुंबईत झालेल्या शेतकरी आंदोलनातील जाहीर सभेत ज्येष्ठ नेते शरद पवार कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आदी नेते उपस्थित होते. त्यांच्यासमोर अबू आझमी यांनी प्रक्षोभक भाषण करताना, देशात वादळ निर्माण करा, असे आवाहन शेतकऱ्यांना केले होते. ही हवा तुम्हाला भस्मसात करून टाकेल, असा इशारा आझमी यांनी पंतप्रधान मोदी यांना भाषणात दिला होता, असे भातखळकर यांनी पत्रात म्हटले आहे.

--------------------

-( संपादन - तुषार सोनवणे )

Investigate Azmi who provoked farmers BJP leaders letter to Union Home Minister

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Monorail : मुंबईकरांसाठी मोठी बातमी ! मोनोरेल अनिश्चित काळासाठी बंद , MMRDA ने का घेतला निर्णय ?

Asia Cup 2025 : आशिया कपमधून माघार घेतल्यास पाकिस्तान बोर्ड लागणार भिकेला? तब्बल 'इतक्या' दशलक्ष डॉलरचं होईल नुकसान

Latest Marathi News Updates : पंतप्रधान मोदींना डोनाल्ड ट्रम्प यांचा फोन; 75 व्या वाढदिवसानिमित्त दिल्या शुभेच्छा

Karad Accident: दुर्दैवी घटना! 'कालेटेकच्या दोघांचा अपघाती मृत्यू'; भरधाव चारचाकीची मोटारसायकला पाठीमागून भीषण धडक..

मोठी बातमी! संजय गांधी निराधार, श्रावणबाळ योजनेतील ‘या’ लाभार्थींना आता दरमहा मिळणार २५०० रुपये; सामाजिक न्याय विभागाचा निर्णय; ऑक्टोबरपासून वाढीव लाभ

SCROLL FOR NEXT