Sanjay Pande Team eSakal
मुंबई

"रिक्षा खरेदी करताना पार्कींग विचारली जाते, मग 'कार'साठी का नाही?"

मुंबईतील वाढत जाणाऱ्या रस्त्यांवरच्या पार्कींगवरुन पोलीस संजय पांडे यांनी चिंता व्यक्त केली आहे.

सुधीर काकडे

मुंबई : राज्यातील मुंबई आणि पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये दिवसेंदिवस लोकसंख्या वाढतेय. शहरातील रस्त्यांवर वाढत जाणाऱ्या गर्दीवरून याचा स्पष्ट अंदाज येतो. जवळपास प्रत्येकजण आपली खासगी गाडी घेऊन फिरणं पसंतं करतो. त्यामुळे दुचाकी आणि चार चाकी वाहनांची संख्या वाढत जातेय. जवळपास प्रत्येक शहरात रोज विकत घेतल्या जाणाऱ्या शेकडो चारचाकी वाहनांमुळे पार्कींग जाम होताना दिसत आहेत. मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी याबद्दल चिंता व्यक्त केली आहे.

संजय पांडे यांनी याबद्दल चिंता करत एक ट्विट केलं आहे. विचार करा, जर एखादी ऑटो किंवा टॅक्सी विकत घेताना त्यांना पार्कींगसाठी जागा दाखवावी लागते. मात्र कार विकत घेताना तसं काहीही विचारलं जात नाही. रोज विकत घेतल्या जाणाऱ्या ६०० पेक्षा जास्त गाड्यांमुळे मुंबईचे रस्ते जाम होत आहेत. याबद्दल विचार करा असं आवाहन संजय पांडेंनी केलं आहे. तसंच नो पार्कींग नो कार म्हणत त्यांनी कंपन्यांनी आता या गोष्टीची दखल घ्यावी असं म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! सततच्या पावसामुळे नुकसान झाले तरच शेतकऱ्यांना मिळणार भरपाई; सततचा पाऊस म्हणजे काय?, सोलापुरातील ‘या’ ३ तालुक्यातच अतिवृष्टी झाल्याची नोंद

दैव की कर्म?

आजचे राशिभविष्य - 24 ऑगस्ट 2025

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 24 ऑगस्ट 2025

टेबल टेनिसमध्ये भारताला ऑलिंपिक पदकाची आशा

SCROLL FOR NEXT