ठाणे : सामाजिक व राजकीय क्षेत्रातील कामकाजात व्यस्त असल्यामुळे भोंगे, हनुमान चालिसा अशा मुद्द्यांसाठी मला वेळ नाही. सध्याच्या घडीला माझ्यासाठी महागाईचा मुद्दा जास्त महत्त्वाचा असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या, खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले. तसेच खासदार असल्याने मतदारसंघात मला खूप कामे आहेत, त्यामुळे ती कामे माझ्या दृष्टीने महत्त्वाची आहे. त्यामुळे मला इतर गोष्टींकडे बघण्यासाठी वेळ नसल्याचे सांगत राणा दाम्पत्याचे नाव न घेता टोला लगावला.
ठाणे शहरात टिप टॉप प्लाझा येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी त्या बोलत होत्या. अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्यावर अन्याय झाला आहे. त्यांच्यावर काही आरोप करण्यात आलेले आहेत, त्यात तथ्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गणेश नाईक यांच्यावर झालेल्या आरोपाबाबत मात्र कोणाच्याही वैयक्तिक आयुष्यावर आरोप-प्रत्यारोप करणे अयोग्य असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचा मुलांवर देखील परिणाम होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
विरोध वैचारिक असावा
पालघर (बातमीदार) : देशातील सर्व राज्ये महागाई कमी करण्यासाठी व्यस्त आहेत. केंद्र सरकारकडून जीएसटीचे पैसे वेळेवर मिळत नाहीत. आज प्रत्येक पक्ष सध्या महागाईच्या विरोधात लढत आहे. मात्र कोणत्याही प्रकारचा मार्ग केंद्र सरकार काढू शकलेले नाही, अशी टीका मनोरमध्ये खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.