मुंबई

कल्याणच्या पत्रीपुलावरून शिवसेनेवर निशाणा

सकाळ वृत्तसेवा

कल्याण : कल्याणमधील पत्रीपुलाचे काम रखडल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन्‌ करावा लागत आहे. हाच मुद्दा उपस्थित करत मंगळवारी भाजपच्या वतीने पत्री पुलाजवळ धरणे आंदोलन करण्यात आले. या वेळी राज्य सरकार आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात घोषणा देण्यात आल्या. पत्रीपुलाचे कामकाज केवळ भाजपला श्रेय मिळू नये म्हणून पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आडमुठ्या धोरणामुळे रखडलेले आहे. त्यामुळे जनतेला वेठीस धरले जात असल्याचा आरोप करत भाजपने आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. 

दरम्यान, या सर्व पार्श्‍वभूमीवर महापौर विनिता राणे यांनी तातडीने पत्रकार परिषद घेत शिवसेनेला लोकांची कामे करण्यात अधिक रस आहे; श्रेयाची लढाई आम्हाला लढायची नाही, असा खुलासा केला; तर सभागृहनेते प्रकाश पेणकर यांनी मे 2020 पर्यंत हा पूल खुला होईल अशी माहिती दिली. फेब्रुवारी 2020 मध्ये पत्री पूल नागरिकांना खुला होणार, असा फलक कल्याण पश्‍चिमेचे आमदार विश्‍वनाथ भोईर यांनी लावला होता.

प्रत्यक्षात आजही या पुलाचे काम संथगतीने सुरू असल्याने भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी आज धरणे आंदोलन केले. दरम्यान, खासदार डॉ. शिंदे तसेच ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे या कामाचा प्रत्यक्ष पाठपुरावा करत आहेत. या परिसरात काही तांत्रिक अडचणी असल्यामुळे पुलाच्या कामाला थोडा उशीर होत आहे. शिवसेना सर्वसामान्यांसाठी काम करत असते, श्रेय लाटण्यासाठी काम करण्याची आमच्या पक्षाची पद्धत नाही, असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला. 

कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे पत्री पुलाच्या कामाचा पाठपुरावा करत आहेत. या पुलाचे गर्डर हैदराबाद येथे तयार करण्यात आले. तेथे जाऊन शिंदे यांनी त्याची पाहणी केली. रेल्वेच्या अधिकाऱ्यांशी वारंवार बैठका घेऊन प्रत्यक्ष जागेची पाहणी करून प्रशासनाच्या अडचणी समजावून घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला. भिवंडीचे खासदार कपिल पाटील यांनी विषयात किती लक्ष घातले, असा सवाल सभागृह नेते प्रकाश पेणकर यांनी केला.

भाजप जे आंदोलन करत आहे ते पालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केले जात आहे. श्रेयासाठी ही त्यांची नौटंकी आहे, अशी टीकाही पेणकर यांनी केली. मागील पाच वर्षे कल्याण पूर्व तसेच पश्‍चिम या परिसरात भाजपचे आमदार होते. त्यांचे खासदारही या ठिकाणी होते. त्यांनी या विषयात किती लक्ष घातले, अशी विचारणाही त्यांनी केली. या पुलाच्या कामात दिरंगाई होत आहे हे मान्य करत पेणकर यांनी त्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT