prakash ambedkar 
मुंबई

Kolhapur riots : नागपूर SITचा 'तो' अहवाल खुला करा, मग कळेल दंगली...; आंबेडकरांची मागणी

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - नागपूरच्या एसआयटीने काही दिवसापूर्वी रिपोर्ट केला होता. काही ठिकाणी दंगल होणार असा रिपोर्ट आहे. तो लोकांसमोर आणला तर आणखी ठिकाणे पुढं येतील. त्या रिपोर्टच काय झालं तो रिपोर्ट पुढे आणा, तो रिपोर्ट पुढे आला तर लोकांना कळेल की दंगली कशा इंजिनिअर्ड आहेत, असे मत कोल्हापूर दंगलीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले.

राज्यात काही ठिकाणी दंगली होतायेत, काही संघटनांचा अजेंडा आहे, असे मतही प्रकाश आंबेडकर यांनी मांडलं. कोल्हापूरात हिंदूत्ववादी संघटनांनी पुकारलेला बंदला हिंसक वऴण लागले. 13 ठिकाणी दगडफेक झाली. या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर बोलत होते.

यावेळी आंबेडकरांनी मुंबईत झालेल्या तरुणीच्या हत्येवरूनही चौकशीची मागणी केली. सावित्रिबाई फुले वसतीगृहात 18 वर्षांच्या मुलीवर झालेला अत्याचार आणि निघृण हत्या यासंदर्भात आंबेडकर यांनी आज नरिमन पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. याप्रकरणाची संपूर्ण चौकशी करा, अशी त्यांनी मागणी केली. सरकार नेहमी असं करत की घटना घडल्यानंतर चौकशी सुरु करते, अगोदर उपायोजना का केली जात नाही, असा सवाल त्यांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ESMA Act : भारत सरकारने गॅस तुटवड्यामुळे लागू केला एस्मा कायदा, LPG वितरणावर राहणार नियंत्रण, साठेबाजांची खैर नाही

पोर्शे कार अपघात प्रकरणी अल्पवयीन आरोपीच्या वडिलांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा, २२ महिन्यांनी जामीन मंजूर

Latest Marathi News Live Update : एलपीजी (LPG) गॅसच्या तुटवड्याचा हॉटेल व्यवसायावर परिणाम

विम्याच्या पैशांसाठी अपघाती मृत्यूचा बनाव, मृतदेहाशिवाय शवविच्छेदन अहवाल अन् FIR; पत्नीसह डॉक्टर आणि ४ पोलिसांना अटक

BCCI Rewards T20 WC Champions: वर्ल्ड कप जिंकून इतिहास रचणाऱ्या भारतीय संघाला १३१ कोटींचं बक्षीस; सूर्याची टीम झाली मालामाल

SCROLL FOR NEXT